Tuesday, November 11, 2014

चाळीशी


चाळीशीत...
चष्मा लागतो
दमही लागतो..
वजन वाढतं
उगाच धडधडतं..
बी.पी. सुद्धा कधी कमी कधी जास्तं
तब्येत कधी ऊत्तम तर कधी नादुरुस्तं
झोप ऊडते..
चिंता पिडते
केसंही थोडे ऊडतातंच
नाही म्हटलं तरी..
आरश्यातल्या प्रतिबिंबाशी नजरा भिडतातंच
तेल तिखट मिठाचे ठरतात नवे नियम
मनाविरुद्ध का होईना पाळावे लागतात कायम
हि चाळीशी मात्र जरा वेगळी आहे..
अजून बराच पल्ला गाठायची जिद्द उरात सगळी आहे
चष्म्यासोबत दूरदृष्टी मिळालीये
दम सोडा हो पण आस्ते चालण्याची मजाही कळालीये
या चाळीस वर्षात वजन अन धडधड वाढली
पण वाढली प्रेमापोटी
नाडीच्या प्रत्येक ठोक्यासोबत
नाव एकमेकांचंच ओठी
सावलीत एकमेकांच्या
निश्चिंत असतो
आरसा हवा कशाला
डोळ्यातंच एकमेकांच्या सुंदर दिसतो..
खाण्या पिण्याच्या निर्बंधांना मी म्हणतो जुलमी नियम
अन ती मात्र शिकवत राहते "ठेवा थोडासा संयम"

तर लग्नाची हि चाळीशी गाठली
घेऊन हातात हात...
जन्मोजन्मीची साथ आहे लेकांनो
हि तर आहे फक्त सुरुवात...


लग्नाच्या चाळीसाव्या वाढदिवसाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा

कुणाल, ज्यो, ताई, माई

"येथे थुंकू नये" च्या बोर्डावरंच
थुंकण्यात काय असते मजा?
ईन की पिंक से बचाने के लिये
भगवान की तस्वीर को भी सिंडीयोके कोने मे चिपकाने की सजा

हटकून उधळता चौका चौकात तुम्ही
पाहून लाल दिवा
साला और कितने दिन करेगी माँ
तुम्हारे लंबी ऊम्र की दुआँ?

चार दोन रुपड्यांचा धूर
ऊडवता हवेत रुबाबात
देखी न आप जैसी हस्तीया
जो करती है अपनी ही चिता जलाने की शुरुवात

नाक्या नाक्यावर छेडता तुम्ही
कोणाची बहिण, बायको, मुलगी कोणाची सून
आते जाते आँखे मुंदने वाले हम
सिर्फ ब्रेकींग न्यूज देख के खोलता है हमारा खून

धरणात मुतण्याची भाषा करणाऱ्या
राजकारण्यांकडे भरभरुन सगळं पण
"वरचा" मजला "खाली" आहे
साला ईस देश मे आजकल
राजनीती सबसे बडी गाली है

जगले वाचले किती
या दुष्काळाच्या दातातून
बिसलेरी कम पडे तो
पियेंगे बचे हुवो का भी खून

सडलेल्या सिस्टीमला शिव्या घालत
बसता बोंबलत घरी
ऐसे निकम्मो की वजह से तो होते है
खून से लतपत हाथो से नेता बाईज्जत बरी

तुझं नाव घेऊन भिडतो एकमेकांना
भगवा हिरवा अन रक्ताचा लाल रंग ताजा
मंदिर मस्जिद मजहब और कौम मे
बाँटने की मौला तुझको भी मिली है सजा

के पी आर

सरबजीत सोबत भारताचा स्वाभिमानही मेला??


मरेस्तोवर दुर्लक्षित असलेला सरबजीत
मेल्यावर... मेला म्हणू नका
शहीद म्हणा... देशाचा वीर...
एक कोटीची मदत... पंचवीस लाखाची मदत
२२ वर्षाच्या यातना सव्वा कोटीत विकत घेण्याचा
जीवघेणा अन निर्लज्ज प्रकार...
सरकारकडून पाकिस्तानचा निषेध...
हल्लेखोरांना कडक शासन होईल याची आशा
(अरे डोळे झाकून दूध पिणाऱ्यांनो अजून कळत का नाही हे जेलमधल्या कैद्यांचं कृत्य नाही ही पाकिस्तानची नापाक नीती आहे)
आज ताणले गेलेले संबध सुरळीत करण्यासाठी
दोन महिन्यांनी परत प्रयत्न..
मग भारत पाक क्रिकेट सिरीज
अमन की आशा
खिरापतिसारखे व्हिसा वाटप...
अन पुन्हा ये रे माझ्या मागल्या...
मॅच बघायला म्हणून आलेले
कित्येक ईथेच पांगतील
आधार कार्डासाठी रांग लाऊन त्यांचा हक्कही सांगतील
अन पाकिस्तानातल्या जेलमधे सरबजीतवर हल्ला केला तसाच
परत एकदा...
भारतातंच भारतीयांवरंच होईल हल्ला...
त्यातल्या एखाद्या अतिरेक्याला पकडून
ठेवली जाईल त्याची बडदास्त
परत एकदा टिकेचा मारा
निषेधाचे पुळचट शब्द...
लोकसभा तहकूब...
"आम्ही तुमच्याशी क्रिकेट खेळणार नाही जा" हा गर्भित ईशारा
अन चार दिवसांनी वाटचाल
नव्या हल्ल्याकडे...
हे सारं असंच चालणार का?
चालू द्यायचं का?
सरबजीत गेला...
हुतात्मा झाला...
कणाहीन राजकारण्यांसारखं
असंच म्हणत रहायचं???
की डोळे ऊघडून समजून घेयचं
सरबजीत सोबत भारताचा स्वाभिमानही मेला??

(जागं व्हायचं की आपणही पडून रहायचं सुस्त
थंड रक्तानं, दगडी अंतःकरणानं...
पुळचट राजकारण्यांचा वाण नाही पण गुण लागला म्हणत??)

के पी आर

तुला का गं जायचं असतं??


तुला का गं जायचं असतं??

आल्या आल्या त्याला माझ्याकडे येयचं नसतं
मला बघितल्यावर त्याचं उगाचंच बिनसतं
हाक मारली तरी बसतो कसा रुसुन
सवय होते हळू हळू, बघतो मग हसून
हाका मारतो येता जाता
"खेल माज्याशी" म्हणतो मांडीवर बसता बसता
सुरुवातीचे कित्येक दिवस आमचं जुळत नसतं
नेमकी आमची गट्टी जमल्यावरंच
तुला का गं जायचं असतं??

हाताला धरुन म्हणतो इते बश
गोग्गोड हसून करतो सगळ्यांना वश
बोबडं बोबडं बोलून वेड लावतो पार
गाल कपाळ ओठावर देतो मुके किमान चार
त्याच्या ईवल्याशा डोळ्यातंच
आता सुख आम्हाला दिसतं
तेव्हाच नजर चोरुन तुला का गं जायचं असतं??

ती ही एअरपोर्टवर, आल्या आल्या बिलगते..
आजी भाऊ कुठयेत विचारत त्यांनाही हुडकते
रोज संध्याकाळी माझी वाट बघत बसते
ऊशीर झाला म्हणून रुसली तर अजूनंच गोड दिसते
रोजच्या रहाटगाडग्यात तिला फिरायला नेणं राहतं
कोपऱ्यावरचं गार्डन रोज वाट तिची पाहतं
कामाला दांडी मारुन आता गार्डन ठरलेलं असतं..
तिच्यासाठी वेळ काढल्यावरंच नेमकं
तुला का गं जायचं असतं??

थोडसं तिला चिडवल्यावर बसते ती फुगुन
हसू दाबत राहतो आम्ही, तिला असं बघून
त्याचा तर आवाज गगनाला भिडतो
छोट्याशा गोष्टीतही असा जाम चिडतो
आपल्या सगळ्या घरात जीव भरतात दोघं
क्षणभर नजरेआड झाले तरी वारं सुटतं ऊभं
त्यांच्या सवयीनं काळीज वेडंपिसं झालेलं असतं
नेमकं हे वेड जपल्यावरंच
तुला का गं जायचं असतं??

त्यांना पंखाखाली घेऊन अशीच जातेस तू ऊडून
डोळ्यात काळजात घरात सगळ्या..
आठवणी त्यांच्या बसतात अशा दडून
आवंढा गिळत गिळत आम्ही..
एकमेकांच्या नजरा ऊगाच चुकवतो
मोकळ्या घराकडं बघत
आठवणींना हाताला धरुन ऊठवतो
फोटोंवरुन हात फिरवत..
दूधाची तहान ताकावर भागवत का गं रहावं लागत?
राहून राहून एकंच प्रश्न...
फिरुन फिरुन मन, ऊत्तर एकंच मागतं
तुला का गं जावं लागतं
तुला का गं जायचं असतं??

के पी आर

Thursday, October 9, 2014

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा


कमलेश  भाऊंचं कमलकुंज प्रशस्त आणि मोठं देखणं होतं. भिंती, छत मस्तपैकी भगव्या रंगात रंगवलेलं होतं आणि खिडक्या दारं तेवढी हिरवी होती. दारं-खिडक्या म्हणे हिरव्या असाव्या, प्रवेश जरी त्यातून घेतला तर आत कसं सगळं भगवं असतं आणि त्याहून बाहेरुन हिरवा आभासही होतोच. अन पांढऱ्या रंगाला मात्र तिथे जागा नव्हती कारण पांढरा रंगं म्हणजे शांतता, तह... आणि तह बिह छ्यॅट कमलेश भाऊंना जमलाच नाही कधी. पण खरं सांगायचं तर गेल्या काही वर्षात या देखण्या वास्तूला अवकळा आली होती, का कुणास ठाऊक. कोणी काही करो अपयश ईथल्या लोकांच्या पाचवीला पुजलेलं असायचं. आणि खरंतर कमलकुंज मधले जवळपास सगळे सदस्य ढाराढूर झोपलेले असायचे, दिवसरात्र... अगदी कोमात गेल्यासारखे किंवा कुंभकरणासारखे म्हणू आपण हवं तर. आणि त्यामुळेच कमलेश भाऊंच्या विरोधकांचं फावत होतं. हा  पण यांची झोप हि अगदी कुंभकर्णासारखीच असायची, भूक(?) लागली कि ठराविक सदस्य उठायचे टामटूमीत खायचे प्यायचे नि परत झोपायला तयार. तर अशा दीर्घ काळच्या झोपेनंतर अचानक देशभरात म्हणे परीवर्तनाची लाट आली आणि त्या लाटेत बाकी सगळे वाहून गेले तसे कमलकुंज मधले सदस्य जागे झाले...


या लाटेनंतर तीन महिन्यांनी सुद्धा कमलकुंज मधले सदस्य जाग आल्याचा आव आणू लागले. एक दिवस कुस बदलत असताना लोकांना वाटलं ते उठतायेत पण त्यांनी आळोखे पिळोखे देत पडून राहणं पसंत केलं. आता कोणत्याही क्षणी हे उठणार म्हणून लोकांनी त्यांच्या खाण्या पिण्याची तयारी करायला सुरुवात केली. कमलेश भाऊंचा एव्हाना "कमलेस भाई" झाला होता. तर काही सदस्य आळोखे पिळोखे देत जावेगर उठून बसले आणि डोळे चोळत चोळत कमलकुंजमधे नजर फिरवू लागले. त्यांच्या नजरेतलं आश्चर्य लपत नव्हतं, कमलकुंज मधे अगदी नव्यानंच मधोमध एक भिंतं घालण्यात आली होती. अगदी भिंतीला प्लॅस्टरही करणं बाकी होतं, बांधकाम ओलं होतं. ते बघून भानावर येत काही जणांनी विचारायला सुरुवात केली कि हा काय प्रकार आहे. लोक म्हणाले दाढीवाले काका आले होते त्यांच्याकडे काही जागृत सदस्यांनी तक्रार केली कमलकुंजमधल्या खुर्च्या अपुऱ्या पडत आहेत. आपल्या सगळ्या सदस्यांना बसायची सोय नाही, आपले मित्र म्हणत म्हणत काही लोक बाण घेऊन येतायेत आणि आपल्या हक्काच्या खुर्च्यांवर अतिक्रमण करतायेत. काका चिडले, एक हात गुळगुळीत डोक्यावर आणि एक हात वाढलेल्या दाढीवर फिरवत म्हणाले बास झालं शेअरींग आता दाखवा डेअरींग.. उंदराला वाघ केलं आता परत उंदीर करा, चला कामाला लागा, लाटेच्या शाही पाण्याची मस्ती काय असते दाखवा सगळ्यांना... घाला भिंत मधोमध. कुणीतरी आगाऊ म्हणाला आहो पण भिंत घातली तरी खुर्च्या अपुऱ्या पडणारंच ना? त्यावर काका हसून म्हणाले ते माझ्यावर सोपवा, मी ऑलरेडी ज्यादाच्या खुर्च्या घेऊन फिरतोय, मला आयडीया होतीच या सगळ्याची म्हणून बाणवाल्यांना मी सांगितलंय नो ऊल्लू बनाविंग.

मग काय सगळे जोमाने कामाला लागले, भिंतं उभारली.. भिंतीच्या पलिकडची सगळी कमळं खुडून कमलकुंज मधे आणली. वाढीव खुर्च्या भिंतीच्या अलिकडे मांडण्यात आल्या, ईतके वर्ष संगीत खुर्चीच्या खेळामधे खुर्ची पकडण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारे सदस्य खुश झाले. त्यांना वाटलं आता आपण फक्त खुर्च्या आणि सतरंज्या टाकायचं आणि काढायचं काम नाही करणार, आपली जागा निश्चित म्हणून ते निश्चिंत झाले. परत एकदा म्युजिक चालू झालं आता खुर्च्या पकडून आपापली जागा निश्चित करण्यासाठी ईनमीन एकंच दिवस शिल्लक राहिला होता. कमलकुंज महाराष्ट्रात असूनंही संगीत खुर्चीसाठी गरब्याच्या टिपऱ्यांचं म्युजिक वाजू लागलं. पूर्वापार खुर्ची न मिळणारे सदस्य ज्यादाच्या खुर्च्या आल्यामुळे गाफील राहीले, त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत दगा फटका झाला. एक नाही दोन नाही तब्बल पासष्टं लोक कमलकुंजमधे घुसले आणि वाढीव खुर्च्यांवर अतिक्रमण करुन बसले. काही जुन्या सदस्यांना संताप अनावर झाला, म्हणाले महाराष्ट्रात हे नेहमीचं झालंय परप्रांतीय येतात काय अन कळायच्या आत अतिक्रमण करतात काय. नाही सहन होत आता आणि का करायचं सहन वाटणी झाल्यावर, खुर्च्या नव्यानं वाढल्यावर? रागाच्या भरात, तिरमिरीत ते दाढीवाल्या काकांकडे तक्रार करायला निघाले, दाढीवाल्या काकांना दाराशी उभं राहीलेलं पाहूम थोडं थबकले आणि मनोमन निराशही झाले. कारण गरब्याचं म्युजिक संपण्याआधी अचानक कमलकुंजच्या बाहेरुन येऊन वाढीव खुर्च्या पकडणारे काही लोक प्रवेशद्वारातून राजरोसपणे आत येत होते. दाढीवाले काका या लोकांना आत घेताना भगवा पंचा त्यांच्या गळ्यात घालत होते आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे परीवर्तनाच्या लाटेतलं शाही पाणी ज्या कळशीत भरुन ठेवलं होतं त्यातून या आगंतुकांवर शिंपडून त्यांनाही पवित्र करुन आत घेत होते, स्वागत करत होते. कुणीतरी हिंमत करुन म्हणालंच की आहो काका पण हे कालपरवा पर्यंत आपल्या विरोधात होते, आरोप आहेत यांच्यावर. काका फक्त हसले आणि तांब्याचा गडवा स्वतःच्या डोक्यावरुन ओतून घेतानाच्या फोटोकडे बोट दाखवून म्हणाले परीवर्तनाच्या लाटेतल्या शाही पाण्यानं सगळी पापं धुवून निघतात, चला कामाला लागा. काहीजण निमूटपणे मागे फिरले तर काहीजण अंगावरचं लाटेतलं पाणी पुसत भिंतीच्या पलिकडे गेले धनुष्य खांद्यावर पेलायला.


तर या अशा सगळ्या धामधुमीत वर्षानुवर्षाच्या कुंभकरणीय झोपेतून उठून, पक्वान्नांचा सुवास नाकात भरुन घेत, डोळे चोळत कमलकुंजमधले सदस्य त्यांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नसताना महाराष्ट्र शोधायला निघाले, गेल्या कित्येक वर्षात ते झोपेत असताना बदलेला, घडलेला, बिघडलेला महाराष्ट्र त्यांना ओळखू येईना तसे सैरभैर होत त्यांनी कंठाळी ओरडायला सुरुवात केली, "अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा". जसजसा वेळ जाऊ लागला तसतसं येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला गाठून विचारणा सुरु झाली.. टिव्ही, रेडीओ, वर्तमानपत्रातून सगळीकडे बातमी पसरली की महाराष्ट्र सापडेना. कुठे नेऊन ठेवलाय,कुठे नेऊन ठेवलाय,कुठे नेऊन ठेवलाय... शोधा नाहीतर खुर्चीवर कसं बसणार म्हणाले दाढीवाले काका. नेमही भिंतीवरंच बसणारे एक सद्‌गृहस्त दाढीवाल्या काकांच्या पलिकडे पण भिंतीच्या अलीकडे एकटेच आपली दाढी कुरवाळत, चित्रविचित्र ज्यॅकेट घालून कविता करत बसले होते. म्हणे "जिसको नही हय परीवर्तन के लाट के बारे मै अक्कल... जिसकोsss नही हय परीवर्तन के लाट के बारे मे अक्कल, निकाल के नंतर तो बरोबर सबकुछ शिक्कल". आपण कुंभकरणीय झोपेत असताना हरवलेल्या महाराष्ट्राचा काही थांगपत्ता लागत नाही हे लक्षात येताच घायकुतीला येत कमलकुंजमधल्या कालपरवा जागे झालेल्या सदस्यांनी अजून मोठमोठ्यांनी विचारणा करायला सुरुवात केली, "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा" कुठे नेऊन ठेवलाय,कुठे नेऊन ठेवलाय... तेवढ्यात भिंतीपलीकडून नाकावर मास्क चढवत जनतेतल्या काहीजणांनी डोकावून पहायला सुरुवात केली आणि म्हणाले, "ईतके वर्ष चिरनिद्रेत असलेल्या, खाऊन पिऊन सुस्तावलेल्या आणि महाराष्ट्राला विसरलेल्या लोकांनो, महाराष्ट्राचं राहू द्या पण एक सांगा  कुठे नेऊन ठेवलाय शहाणपणा तुमचा, कुठे होता बाणेदारपणा तुमचा, आणि कुठे नेऊन ठेवला होता आमच्या बद्दलचा पुळका तुमचा?"

ताक:
१) असं विचारलेल्यांच्या तोंडात स्वतःचे दात आता औषधालाही शिल्लक नाहीत
२) आमच्यामुळेच महाराष्ट्र पहिला, भविष्य अमुकतमुकच्या हाती वगैरे म्हणणाऱ्यांची दखल कोणीच घेईना मग आम्ही तरी चार दोन वाक्य त्यांच्यावर का वाया घालवावी असा एक प्रश्न मनात घोळतोय
३) आणि दाढीवाल्यांचं पिक वाढलंय तर दोन भावांनी एकत्र येऊन एकेकाची हजामत का करु नये असा एक विचारंही सारखा मनात डोकावतोय...

असो... माझा महाराष्ट्र कुठे आहे याचा शोध लागेपर्यंत माझ्या महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करायला निघतील कदाचित... कदाचित मुंबई मधून ऊद्योगांना पाय फुटून केम छो करत पलिकडे उडी मारतील... कदाचित देशाचे पंतप्रधान महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या प्रचाराच्या तयारीला लागतील.. कदाचित पाकिस्तान गोळ्या झाडत राहील आणि कदाचित लाटेपूर्वी ५६ इंच असणारी छाती ३६ वर येऊन पोहचेल.. कदाचित शाही लाट नाकातोंडात जाईल.. कदाचित आज एकमेकांची डोकी फोडणारे गळ्यात गळे घालतील... कदाचित निष्ठावान कार्यकर्ते पुढच्यावेळीही खुर्ची मिळण्याची अपेक्षा न ठेवता सतरंज्या टाकत आणि काढत राहतील... कदाचित जनता मत देईल, काळ्या शाईचे फोटो फेसबूकावर आणि व्हॉट्‌सअ‍ॅपवर टाकेल, निकालावर चर्चा करेल.. आणि कदाचित विरोधी पक्षासोबत पुढच्या निवडणूकीपर्यंत मी मत देऊन माझी जवाबदारी पूर्ण केलीये म्हणत कुंभकरणासारखी ढाराढूर झोपी जाईल.. कदाचित काही वेगळं घडेल... कदाचित विकास होईल... कदाचित परत महाराष्ट्र शोधायची वेळ येणार नाही... कदाचित... कदाचित... कदाचित

के पी आर

Tuesday, September 23, 2014

आपल्या वॉट्‌स अ‍ॅप ग्रुपचं विश्लेषण SCOE


मित्रांनो हे सगळं मजा मस्करीमधे लिहिलं आहे तरी कोणी कृपया वाचून मनात राग धरु नये आणि गैरसमज करुन घेऊ नये ही मनःपूर्वक विनंती. यामधे कोणालाही दुखवण्याचा किंवा त्रास देण्याचा हेतू नाही.. यारी दोस्तीत लिहिलंय गड्यांनो... तर भाऊड्याहो विश्लेषण जरा मोठंच आहे पण शेवटपर्यंत वाचा आणि नक्की सांगा कसं आहे ते.

आपल्या वॉट्‌स अ‍ॅप ग्रुपचं विश्लेषण (SCOE)

दिवाळीच्या सकाळी आपली एक रुढी म्हणून काहीजणं फटाके ऊडवतात. फटाके ऊडावणं फारसं आवडत नसलं तरी आपला प्रघात पडलाय म्हणून उडवतात. दोन-चार फटाके लावतात, वात पेटवल्यावर घाईघाईत लांब जाऊन ऊभे राहतात आणि दोन्ही हातांनी कान घट्ट दाबून धरतात. पाच दहा मिनिटामधे हा कार्यक्रम गुंडाळून निघून जातात. आपला प्रसाद उगले त्या प्रघात म्हणून फटाके ऊडवणाऱ्या माणसा सारखा आहे.  रोज सकाळी ग्रुपवर येतो, दोन-चार मेसेजेस टाकतो आणि पसार होतो.

मित्रांनो जातीवाचक बोलण्याचा उद्देश नाहीये, कृपया कोणीही गैरसमज करुन घेऊ नका हि विनंती) मराठा मंडळींच्या लग्नपत्रिकेत नेहमी नावांची मोठी यादी असते. प्रेषक, कार्यवाहक, निमंत्रक, आमचे आदरस्थान वगैरे वगैरे. त्यात त्यांच्याशी काहीच संबंध नसलेल्या लोकांचीही भली मोठी यादी असते, म्हणजे निमंत्रक श्री. अमुक तमुक, भाजयुमो जिल्हाध्यक्ष, श्री. फलाना ढिमका विद्यमान आमदार, श्री हे ते माननीय नगरसेवक आणि कोण कोण. या लोकांना आयडीयाच नसते कि यांची नावं लग्नपत्रिकेत आहेत. छापणारे मात्र माननीयांना अजून मान द्यायचा म्हणून नावं छापत राहतात. तसेच आपले आनंद बखारे, सचिन सिनगारे, राहुल संघवी, शैलेश गाडवे, किरण चौधरी, विवेक दानेज, अमोल शिंदे, निलेश गोयल, रोहित जोशी, भुज्या.. हे आपले मित्र कळत नकळत आपल्या ग्रुपची शान वाढवतायेत पण यांची नावं आपल्या ग्रुपमधे छापलेली आहेत हि आयडिया तरी आहे का आपल्या मित्रांना?

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, कसा का खेळेना तो या पदावर कायम आहे. पाच पंचवीस मॅचेसमधे तो एखादी मॅच ब्यॅट आडवी तिडवी करत जोरजोरात रन्स करतो मग पुढच्या पाच पंचवीस मॅचेससाठी तो निवांत. टिममधे तर असतो, ग्राऊंडवरसुद्धा दिसतो पण टीममधे नसल्यागत खेळत(?) राहतो. तसाच आपला संघनायक अतुल कुलकर्णी अधून मधून ग्रुपमधे डोकावतो चार दोन मेसेज चिकटवतो आणि परत निवांत.

एका मुलाला लव्ह मॅरेज करायचं असतं, मुलीच्या घरचे काहीच बोलत नसतात. हा पोरगा उठसूट त्यांच्याकडे फेऱ्या मारत असतो, काही ना काही विषय काढत असतो, भरभरुन बोलतो. मनोरंजन करतो, अगदी पुढे पुढे करुन होतं मुलीच्या घरच्यांपुढे पण तिचे आई वडील चकार शब्द काढत नाहीत. त्याल वाटतं आता काही बोलतील, नंतर बोलतील पण ते गप्पच. ते काय बोलतायेत हे ऐकण्यासाठी कानांत जीव ओतून वाट बघत असतो तो आणि ते कधीतरी हळूच एखादं वाक्य बोलतात. याच्या आशा वाढतात, वाटतं अजून बोलतील, हुरुप वाढतो याचा अजून भरभरुन बोलू लागतो पण मग मुलीचे आई वडील परत गप्प बसतात ते गप्पच.. हा प्रार्थना करतो मनोमन की परत लवकर बोलावे, पण कुणास ठाऊक कधी बोलतील परत? तसे आपले इंद्रजीत आणि चिन्मय पंडित, यांच्या एखाद्या वाक्यासाठी आख्खा ग्रुप जीव काढतो आणि हे एखाद दुसरं वाक्य बोलून गायब. आख्खा ग्रुप त्या लग्नाळलेल्या मुलासारखं यांच्या एकाद्या वाक्यासाठी तरसतात आणि एका वाक्यानं खुश होतात तर हे लगेच गायब.

आपल्या कॉलेजला स्वारगेटवरुन ५४ नंबरची बस येयची. येण्याजाण्याचे टायमिंग्ज ठरलेले असायचे. आपल्या आखून दिलेल्या रुटवर ती बस शेड्यूलप्रमाणे अविरत चालायची, बसमधे पोरं येऊ न येऊ तिला फरक नाही पडायचा. ती आपली ठरलेल्या वेळेत येणारंच, आपलं काम चोख.. तसेच आपले ऋषिकेश गुळुंजकर आणि धिंग्या, हे दोघं रोज ईमानेईतबारे ग्रुपवर येणार म्हणजे येणार, मॉर्निंग गुड करणारे मेसेज टाकणारंच आणि न चुकता हि दिनचर्या पाळणारंच. एकवेळ आपली बस पुढे मागे झाली असेल पण हे दोघं एकदम रेग्युलर.

एखादी सिरीयल, पिक्चर, मॅच किंवा बातम्या चालू असतात. मधेच जाहीरात लागते, सिरीयल, पिक्चर किंवा बातम्यांचा विषय काय याच्याशी जाहीरातीचा काहीच संबंध नसतो. सिरियलमधे एखादीचा नवरा तिला सोडून गेलेला असतो आणि ब्रेक होतो जाहीरात लागते टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची.. हनीमून स्पेशल ऑफर.. पिक्चरमधे एखाद्या जोडप्याला मूल होत नसतं आणि तेवढ्यात ब्रेक होतो काँडोमची जाहीरात लागते आणि सांगतात अनचाहे गर्भसे बचिये... मॅच चालू असते, भारतीय टिमचे गडी धडाधडा आऊट होत असतात ब्रेक होतो आणि बच्चन नाचत गात म्हणतो कुछ मिठा हो जाए. त्या जाहीरातींना काही देणंघेणं नसतं मुख्य कार्यक्रमात काय चाल्लय.. पण अशावेळेस कधी कधी या जाहीराती खरंच मच नीडेड ब्रेक देतात.. हसवतात.. तसा आपला हा प्रतिक पत्की. तुम्ही चुत्त्यासारखी काहीही चर्चा करा हा अधून मधून येतो आणि सुपरमॅनच्या जोक्ससारखे झकास जोक्स टाकतो आणि जातो..

टिव्हीवर विविध विषयांवर चर्चासत्र, वादविवाद होतात. त्यामधे वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि राजकिय पक्षातले प्रतिनिधी सहभागी होतात. या पाहुण्यांमधे कॉमन असतात ते म्हणजे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे जनार्दन चांदुरकर, मग विषय कोणता का असेना. त्यांना कोणत्याच विषयाचं वावडं नाही आणि शिवाय त्यांना सगळ्याच विषयाचं ज्ञानंही आहे. असे लोक खरतर दुर्मिळंच पण आपलं परमभाग्य म्हणून आपल्या ग्रुपमधे जितेंद्र आणि जनार्दन नंतर आपल्याला एक असा धडाडीचा नेता आणि अभ्यासू मित्र (पुष्कराज पाटील) पुष्क्याच्या रुपानं लाभलाय.

आपल्या मंडळात एखादा असा असतो जो सकाळी सकाळी येतो आणि म्हणतो पत्ते खेळू, पब्लिक तयार होतं. पत्ते आणतात, तीनपत्ती चालू होते, एकेकजण पैसे लावतो, काऊंटर वाढत जातं आणि शो जसाजसा जवळ येतो तेव्हा हा म्हणतो, "ए पत्ते बंद करा रे, सकाळी सकाळी पत्ते खेळणं वाईट.. किंबहुना कधीच जुगार खेळणं वाईट, पैसे लावणं हा सेन्सीटिव्ह ईश्यू आहे.. बंद करा". कोणी काही बोलण्याआधी मग तो म्हणतो पत्ते पिसायला मीच सुरुवात केली म्हणून मी माफी मागतो. सगळेजण त्याचं ऐकून खेळ बदलतात, हाही त्यांच्यासोबत खेळतो आणि सगळे गुंगलेले बघून तिथून काढता पाय घेतो आणि संध्याकाळी सगळे जाण्याआधी परत एकदा डोकावून जातो, जणू काही मी ईथेच होतो रे. तसा आपला बेल्या, ग्रुपवर येतो विषय बदलायला लावतो, बोलल्यासारखं करतो आणि सगळे रमले की गायब होतो.

दोन बोक्यांची लोण्यावरुन भांडणं चालू असतात, वाटप काही केल्या होत नसतं. तिथे माकड येतं, बोके मोठ्या आशेनं माकडाकडे बघतात, त्याला म्हणतात दादा आम्हाला वाद सोडवायला मदत कर. माकड सगळं ऐकून घेतं, लोणी कोणी आणलं, कोणी मदत केली.. कसं आणलं कोणाचं काँट्रीब्युशन जास्त वगैरे वगैरे आणि सगळं ऐकून झाल्यावर म्हणतो भोसडीच्यांनो लोण्यासाठी कसलं भांडता, खरंतर सगळ्यांसाठी खीर चांगली. अरे पण आमचं काय चाल्लंय, च्यायला आमच्याकडे लोणी आहे, मोठे कष्ट करुन चोरुन आणलंय आणि आयचा घो तू खीरीबद्दल काय बोलतोयेस? अरे चुत्त्यांनो खीर आणि पुरी बेश्टंच एकदम. अरे आमच्याकडे लोणी आहे रे दादू.. लोणी.. मगाशी खीर म्हणालास आता पुरी अ‍ॅड केलीस.. लोणी रे लोणी सगळे वैतागून सांगतात.. हा हसतो म्हणतो खीर पुरी आणि झालंच तर फ्रुट सॅलड लय भारी. आयच्या गावात रे लोण्याबद्दल बोल ना.. खीर पुरी फ्रुट सॅलड आऊट ऑफ क्वच्चन आहे बे... मग हा म्हणतो.. मँगो ज्युस झिंदाबाद.. तसा आपला गणेश सुतार तुम्ही कोणाहीबद्दल बोला त्याला ज्याला सपोर्ट करावं वाटेल (ईर्रीस्पेक्टीव्ह ऑफ पब्लिक ओपिनियन) त्यालाच तो सपोर्ट करणार मग बाकी बोके जाऊदे भोकात.

आपलं कॉलेज, ऑफिस कोणतीही संस्था असो, त्याचे अध्यक्ष, चेअरमन, ट्रस्टीज वगैरे महत्वाची लोकं रोजंच संस्थेच्या लोकांसमोर येत नाहीत पण ते असतात. ते आहेत यामुळे सगळ्यांना हुरुप असतो, मोटीवेशन असतं. वेगवेगळ्या ओकेजन्सला, कार्यक्रमांना, वाढदिवसाला ते आवर्जून हजेरी लावतात सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतात. लोक खुश होतात पुन्हा नव्या जोमानं पुढच्या कार्यक्रमापर्यंत सगळ्यात सहभागी होतात आणि चेअरमन वगैरे मोठ्या लोकांचं दर्शन परत नव्या कार्यक्रमातंच होतं. तसा आपला शंतनू मोघे, प्रत्येक वाढदिवसाला, सणासमारंभाला तो नक्की आवर्जून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि परत येतो नव्या ओकेजनला.

आख्ख्या शहरात मच्छर खूप होतात. मलेरीया, डेंग्यू बिंग्यू आजार पसरवतात. सगळीकडून बोंबाबोंब होते पार, मग लोकांवर ऊपकार केल्यासारखं म्युन्सिपालटी एका माणसाकडे धुराचं मशिन घेऊन पाठवते आणि प्रत्येक एरीयात धुर सोडत फिरवते. धुरवाल्याचं आगमन सगळे नोटीस करतात, लहान पोरं त्याच्या मागं है.. करत पळतात, तो त्याला अलॉट केलेल्या वेळेपर्यंत भकाभका धूर मारत राहतो आणि निघून जातो.. दर चार-दोन दिवसांनी धूरवाला येतो, लोकांना समाधान वाटतं, पोरं खुश होतात, हा भकाभका धूर ओकतो आणि निघून जातो तसा आपला कौट्या चार दोन दिवसांनी येतो भकाभका मेसेजेस ओकतो, धूरवाला जसा मागे पळणाऱ्या पोरांच्या अंगावर ओरडतो तसा हा एखाद्याला एखाद्या पोस्टवरुन ओरडतो आणि निघून जातो.

टिव्हीवर चर्चासत्र चालू असतं, रंगात आलेलं असतं. तेवढ्यात अँकर म्हणतो आपल्याकडे आज एक विशेष पाहुणे आहेत टेलिफोनवरुन आपण त्यांच्याशी संपर्क करुया. फोन लावला जातो पलिकडून उचलतो, अँकर म्हणे अमुक तमुक कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. प्रश्न विचारतो.. विशेष पाहुणा उत्तर देतो, परत प्रश्न परत उत्तर आणि पुढचा प्रश्न विचारल्यावर नेमका विशेष पाहुणा बोलायचा बंद होतो. मग अँकर आपल्याला सांगतो, "असं वाटतंय विशेष पाहुण्यांशी आपला संपर्क तुटलाय, आपण नंतर त्यांच्याकडे परत जाऊ" आणि परत जुन्या पार्टीसिपंट सोबत बोलणं सुरु होतं. तर असा विशेष म्हणून येणारा आणि अचानक संपर्क तुटणारा पाहुणा म्हणजे आपला (पराग कारखानीस) प्यॅगी.

दिवस-रात्र आय.बी.एन लोकमतवर येणारा, क्षणाक्षणाला काही ना काही सांगणारा निखिल वागळे, आपण टिव्ही बंद करायचा जरी म्हणत असलो तरी "अचूक बातमी ठाम मत, पहा फक्त आय.बी.एन लोकमत" म्हणून आय.बी.एन वर स्वतः चिकटून बसलेला आणि लोकांना चिकटायला लावणारा निखील वागळे गेले काही दिवस कुठे आहे काही पत्ता लागेना तो कालपरवा मी मराठी चॅनेलवर एका टॉक शो मधे दिसला. तर या अशा बेपत्ता वागळे सारखा आपला स्वानंद मोकाशी, एरव्ही दिवस रात्र एस्सीओई ग्रुपवर असणारा हा ईसम आजकाल सापडेनासा झालाय. देव न करो हा वागळे सारखा एखाद्या टिनपाट ग्रुपवर अ‍ॅक्टिव दिसायचा.

आपल्या प्रत्येकाच्या एरियामधे संघाची शाखा भरते. त्यात रेग्युलर मेंबर्ससोबतंच काही ईर्रेग्युलर कार्टी असतात, कधी येतात तर कधी टिवल्या बावल्या करत फिरत राहतात. शाखेत एखादे डेडीकेटेड शिक्षक असतात ज्यांना मुलं नियमीत यावी त्यांना शिस्त लागावी असं मनापासून वाटत असतं. मग ते अनियमीत मुलांकडे येताजाता चक्कर टाकतात संघाचं महत्व पटवण्यासाठी त्यांना संघाच्या कार्याची माहीती देतात, एक निःस्वार्थी स्वयंसेवक देशसेवेच्या भावनेने पंतप्रधानपदापर्यंत कसा पोहोचला याचं उदाहरण देतात. मुलांना पटलंय याची खातरजमा करुन घेतात. मुलं माना डोलवतात, काही मनापासून तर काही तोंडदेखले.. शिक्षक समाधानानं आपल्या कामाला निघून जातात, अधून मधून वेगळ्या विषयांना हात घालतात पण बरेचसे विषय देशप्रेम, भाषेची अस्मिता वगैरेशी निगडीत असतात. तर असे डेडीकेटेड शिक्षक म्हणजे आपल्या ग्रुपचे वरिष्ठ सदस्य श्रीयुत अनिरुद्ध देव.

आपला एखादा मामे, चुलत, मावस भाऊ असतो, मित्र असतो. जो कुठल्याही डिस्कशनचा शेवट उदास नोटवर करत असतो. आपण त्याच्याशी गप्पा मारल्या की तो भरभरुन बोलतो, हसतो खिदळतो पण जेव्हा आपण त्याला म्हणतो, काय मग काय चाल्लय? कसा आहेस? मग तो आपल्याला म्हणतो, "बस यार चाल्लय, भेंचोद कंपनी, टार्गेट वाट लागलीये" आपण म्हणतो अरे पण तू तर एम.बी.ए केलं होतंस ना? तसा तो पिसाळतो... म्हणतो, "आयचा घो त्या एम.बी.ए च्या, माती खाल्ली आणि आयच्या गावात एम.बी.ए. केलं यार, तुझ्या कंपनीत ओपनिंग असेल तर सांग" आणि पुढच्यावेळेस एम.बी.ए चा विषय निघेपर्यंत शांत निवांत.. परत एम.बी.ए चा विषय निघाल्यावर जीवाच्या आकांतानं शिव्यांची लाखोली वाहणारा असा मित्र म्हणजे आपला विज्या बाँड.

आणि सरतेशेवटी एकजण असा असतो जो चौकात उभा राहतो सकाळपासून. दुपारची जेवणाची वेळ झाली तरी हा तिथेच, कुणीतरी येतं आवाज देतं विचारतं काय करतोएस रे? हा म्हणतो काय नाय.. निवांते. या आपल्या मित्रापाशी गाडी थांबवून तो म्हणतो बस येऊ जाऊन जरा. कुठ? अरे चल रे टिळक रोडला जाऊन येऊ. मित्र म्हणतो अरे घरचे जेवायला थांबलेत मी फोन... त्याला मधेच तोडून हा म्हणतो चल रे नाहीतरी तुला लय महत्वाची कामं आहेत चल बस.. आपला मित्र बसतो निमूट, जातो.. सगळी कामं उरकून तो गाडीवाला याला संध्याकाळी चौकात आणून सोडतो, घरचं जेवण तसंच राहतं, हा खुशाल पान खाऊन येतो. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन करतो, कोण कोणासारखं आहे यावर जोक्स मारतो.. जमलं तर लिहितो.. काम काही नसतं सध्या त्याला.. मग घरी जातो रात्रीचं जेवण करतो, शतपावली करायला म्हणून परत चौकात येतो.. जो दिसेल त्याच्याशी गप्पा मारतो, चौकात कोण कसे नमुने दिसले हे रंगवून रंगवून सांगतो. मग एकेकजण चौकातून पाय काढता घेतो म्हणतो यार लै उशीर झालाय, सकाळी लवकर उठायचंय.. च्यायला ऑफिस परत.. तुझं बरंय.. हा हसतो, एकेकाला बाय करतो.. मंदगतीनं घरी येतो.. कडीचा आवाज न करता दार उघडतो. बेडवर पडल्या पडल्या विचार करतो च्यायला मी सगळे कसे आहेत, कोणासारखे आहेत हे ऑब्झर्वेशन केलं लिहूनही काढलं पण मी कोणासारखा आहे..? बराचवेळ विचार केल्यावर त्याला लक्षात येतं की आपण पाळीव पोपटासारखे आहोत जो येईल जे बोलेल ते टिपून आपण तेच परत सादर करतोय का? आणि नकारार्थी मान हलवतो. वेगवेगळ्या गोष्टी सुचतात पण एकही त्याच्याशी जुळत नाही.. मग त्याला जाणवतं आपण चहाच्या गाळासारखे झालो आहोत, आधी चहाच्या डब्यात, मग पातेल्यात पडून राहतो, मग गाळणीत आणि मग सिंकमधे.. जोवर कोणी आपल्याला येऊन हलवत नाही तोवर तिथेच... एखाद्याला चहाची तल्लफ येईपर्यंत आपण त्याचे मग सिंकपर्यंतचा प्रवास... असे काही बाही विचार करत झोपी जातो.. सकाळी उठून परत आवरुन चौकात हजर.. क्रिकेट, राजकारण, निवडणूक, अर्थव्यवस्था सगळ्यावर गप्पा होतात मग कोणीतरी म्हणतं काय करायचं ठरवलयेस पुढं आयुष्यात? हा चिडीचूप.. तर असा हा सध्या ऑल्वेज अ‍ॅव्हलेबल आणि या ना त्या विषयावर बोलणारा पण स्वतःला आयुष्यात काय करायचंय हे अजूनंही माहीती नसणारा तुमचा मित्र (तुम्हाला खरंतर कळलंच असेल पण तरीही फॉर्म्यालिटी म्हणून सांगतोच) म्हणजे कुणाल प्रकाश रुद्राके/कुण्या.

के पी आर

Tuesday, May 27, 2014

पाऊस



त्यानं जुनी डायरी काढली
पानं चाळली..
डोळे मिटून ध्यानस्त बसला..
हातातल्या पेनाच्या खटक्याशी खेळला
टेबलावरच्या कोऱ्या पानाकडे पाहिलं
वाऱ्यामागचं ऊन उगाचंच त्याला दिसत राहिलं
ऊनापल्याडच्या पावसाला
सुचेनाच त्याला, कसं आणावं आपल्या आडोशाला
जाऊ दे म्हणत त्यानं..
खिडकितून आत डोकावणारे ढग
साठवले डोळ्यात..
अन पडायला आसुसलेला पाऊस
जरासा गळ्यात
खिडकिच्या काचेवरची पाण्याची नक्षी
त्यानं पानावर वाहिली
कोऱ्या पानाची एकेक रेघ ओली चिंब होत राहिली

त्याचवेळी
फक्त खिडकित बसण्याऐवजी
ती थंड हवेत बाहेर आली
तेव्हाच नेमकी पावसाला "पडायची" लहर आली
तिच्यासोबत भिजण्यासाठी
पाऊस तिला आवर्जून भेटला
ओल्या मातीच्या अत्तरालाही
तिनं पाऊस थोडा वाटला..
भिजलेला वारा तिनं मनसोक्त उरात भरला
थोडासा पाऊस तरीही तिच्या काळजात उरला
उरलेल्या पावसाचं तिनं केलं गाणं
कागदाच्या होड्यांसारखं तिलाही आवडतं
पहिल्या पावसात वाहत जाणं

हवेला कवेत घेताना, तिच्या तळव्यावर
पाऊस कविता करत राहिला..
त्याच्यासाठी तिनंच..
त्याच्या कवितेत दिसणारा पहिला पाऊस
आज आभाळभर लिहिला

के.पी. आर

Thursday, May 15, 2014

दोघं - भाग ९


सगळं आवरुन झालं होतं आज त्याचं आणि ते ही नेहमीच्या वेळेआधीच. असं कधी व्हायचं नाही त्याच्या बाबतीत. नेहमी सकाळची धावपळ ठरलेली असायचीच. आज मात्र अपवाद होता रुटिनला.. त्यानं लॅपटॉपची बॅग उचलली, स्मार्ट फोनच्या स्क्रिनवर बोट फिरवून पाहिलं, कसलेही नोटिफिकेशन्स नव्हते, क्षणभर मोबाईल हातात धरुन थांबला नकारार्थी मान हलवली आणि मोबाईल खिशात ठेऊन दिला. मनगटावर घड्याळ बांधता बांधता काटे उलटे फिरल्याचा भास झाला त्याला. घाईघाईतंच त्यानं बॅग खाली ठेऊन घड्याळाची डायल दुसऱ्या हातानं झाकली आणि घट्ट दाबून धरली, त्याच्या कानात घड्याळाची टिक टिक आणि छातीतली धडधड घुमत राहिली आणि कॅलेंडरची पानं त्याला घेऊन गेली मागे मागे मागे.

त्या दिवशी असंच त्यानं परत एकवार मनगटावर बांधलेल्या घड्याळात पाहिलं होतं. गेल्या आर्ध्या तासात हि कितवी वेळ होती कुणास ठाऊक? घड्याळ हातात बांधलं तरी वेळ आपल्या हातात नसते ती तिच्या चालीनं चालत राहते, ना जरा सावकाश ना वेगानं. कदाचित म्हणूनंच घड्याळ मनगटावर बांधत असावेत मुठित नाही. का कुणास ठाऊक आज इंपेशंट वागत होता तो खूप, सतराशे साठ वेळा घड्याळात बघून झाल्यावर त्यानं वैतागून मूठ गादीवर आपटली पण सेकंद काटा अक्षरशः खूप खाऊन सुस्तावलेल्या अजगरासारखा टिक टिक करत राहिला. मिनिट काटा जसजसा बाराच्या दिशेनं निघाला तशी त्याची धडधड वाढली. त्यानं मोबाईल उचलला, नंबर डायल केला, काऊंटडाऊन चालू झालं होतं कानात वाजणाऱ्या रींगपेक्षाही जोरानं त्याला स्वतःचे ठोके जाणवत होते. पलिकडून फोन उचलला.
ती: हॅलो
तो: ...
ती: हॅलोss
तो: ...
ती: हॅलोsss ओsss.. आता बोलशील का प्लिज.
तो: शू ssss
ती: काय खेळ आहे हा..
त्याच्या मनगटातल्या घड्याळाचा काटा बारावर सरकला आणि
तो: विश यू ऑल द हॅपीनेस ईन द वर्ल्ड. हॅपी बर्थडे लव्ह. लव्ह यू!
ती: (स्वतःशीच हसत) ....
तो: काय गं, पुण्यात का नाही आलीस? मला भेटायचं होतं तुला आज.
ती: तू सुद्धा ईकडे येऊ शकला असतासंच की पण माझ्या बड्डेला मीच येयचं. जा मी येणारंच नाहीये. आय एक्स्पेक्टेड यू टू कम.
तो: हं.. आय डोंट नो नेक्स्ट ईयर
ती: (मधेच त्याला थांबवत) प्लिज आत्ता नको ना तो विषय. तू आज आला नाहीस हे माझ्या आयुष्यभर लक्षात राहिल.
तो: आणि माझ्या सुद्धा. ये ना प्लिज.
ती: ...
पुढचा तीन चार तास तिला वेटींगवर कोणा ना कोणाचे फोन्स येत राहिले, तिनं सगळ्या कॉल्सकडे दुर्लक्ष केलं कि तिला जाणवलेच नाहीत कुणास ठाऊक.
तो: चल लेट झालाय खूप, झोप आता.
ती: (हताश) हो ना खरंच खूप खूप उशिर झाला रे.. तुला वेळेचं महत्व कळलंच नाही कधी. आय विश..
तो: ...
ती: गूड नाईट, किमान स्वप्नात तरी वेळेवर येतोस ते काय कमी.
तो: लव्ह यू!

जरा डोळा लागतो न लागतो तोवर तिचा फोन परत वाजला. डोळे किलकिले करत तिनं उशाशी पडलेला फोन उचलून त्यावर त्याचं नाव पाहिलं, बेडवर पडल्या पडल्या फोन रिसिव्ह केला.
तो: गूड मॉर्निंग. ऊठा.. आज वाढदिवस आपला आळसात घालवू नका.
ती: काय रे झोपू दे थोडावेळ.
तो: साडे सहा वाजले. आणि मला भेटली नाहीस आज मग मी झोपू देणारंच नाही.
तिनं कानाचा फोन काढून घड्याळ पाहिलं, खरचं साडे सहा वाजले होते. पहाटे तीन साडे तीन पर्यंत बोलत बसल्यावर एवढ्या सकाळी मध्यरात्रीचा फिल येणं सहाजिक होतं. फोन परत कानाला लावत ती त्याच्यावर डाफरली.
ती: आला नाहीस ते नाहीस, आधीच वाढदिवस बेकार जाणार माझा त्यात तू झोप मोड कर... आणि यावर डिफेंड करायचा प्रयत्नंच नको करुस तू
तो: काय गं खरंच भेटायचं होतं मला.
ती: ये मग, अजूनंही वेळ आहे. वाशी पुणे जास्त अंतर नाहीये.
तो: येऊ खरंच?
ती: ...
तो: ठिके, तुझ्याकडे अं.. १५-२० मिनिट आहेत. पटकन आवर आणि बाहेर ये. मी पोचतोच.
ती: (झटकन बेडवर उठून बसत, मोठ्यानं) तू आलाएस?
तो: (तिच्या आवाजातल्या आश्चर्यानं सुखावत) हो. पंधरा मिनिट.
ती: (आवाजातलं आश्चर्य न लपवता) खरंच.
तो: (हसतंच) वेडी आहेस का? कसं पॉसिबल आहे मला. आलाएस का म्हणे
ती: (खर्रकन चेहरा उतरला तिचा) जा माझ्याशी बोलू नकोस.

तो: ए ए ए.. फोन ठेऊ नकोस. पंधरा मिनिट.. पटकन आवर. मी आलोय... तुझी शपथ.
ती: (लाडीक रागात) रात्री का नाही सांगितलंस? मला आवरायला वेळ लागेल... डोक्याला तेल चोपडून ठेवलंय मी. फोन ठेव... चल चल चल... मी आवरते पटकन.
पाचंच मिनिटात त्याचा फोन परत वाजला.
ती: तू... खरंच आलाएस.
तो: अगं मी कसं सांगू तुला?
ती: नाही चार तासापूर्वी आपण गप्पा मारल्या आणि..
तो: हे बघ.. दलेर मेहंदीची कॉन्सर्ट आहे ईथे कसली? पुढच्या महिन्याच्या १२ तारखेला? त्याचे होर्डिंग्ज लागलेत.
ती: तुला कसं माहीत.
तो: परत.. शिवनेरी थांबते तिथे नवं हॉटेल झालंय... ब्रिजच्या खाली एकसाईडचा रस्ता बंद आहे.. काम चालूए.
ती: तू हे सगळं पेपरमधे वाचलं असणार.
तो: ठिके आपण नेहमी भेटतो त्या कॅफेमधे व्हॅलेंटाईन डे स्पेशल स्किम चालूए फॉर न्यूली वेड कपल्स. रेड बोर्ड आहे मोठ्ठा.. व्हाईट फाँटमधे लिहिलय, "सेलिब्रेट यूवर टूगेदरनेस विथ अस"
ती: म्हणजे... तू खरंच आलाएस. (तिच्या आवाजातला आनंद त्याला जाणवत होता)
तो: यू हॅव फिफटीन मिनिट्‌स... ग्रेस टाईम दिलाय समज.
ती: (फोन बंद करत) आलेच.

ती येईपर्यंत त्यानं बाजूच्या स्नॅक्स जॉईंटमधून मोठी कॅडबरी घेतली तिला, बाकी सगळे शॉप्स बंद होते. गाडीला टेकून तो आजूबाजूची लगबग बघत राहिला. आर्ध्या तासात ती धावत-पळतंच तिथे आली. एका खांद्यावरुन घसरणारा दुपट्टा सावरत, एका खांद्यावर पर्स अडकवत लांबूनंच पाहिलं त्यानं तिला. जवळ येताच दोन्ही कान धरले तिनं चिमटीत.
ती: सॉरी.. सॉरी.
तो तिच्याकडे बघतंच राहिला. तिच्या खांद्यावरुन पाठीवर रुळणारे ओले केस.. रात्रभर जागरण केल्यानंतरही दिसणारे पांढरे शुभ्र, बोलके डोळे..
रात्री का नाही सांगितलंस? तिच्या आवाजानं तो भानावर आला. तिच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यासाठी त्यानं काहीही केलं असतं, पुणे वाशी प्रवास म्हणजे काहीच नव्हतं त्यापुढे.
तो: तिच्या डोळ्यात डोळे घालून... मग हा सरप्राईज्ड लूक, आवाजातला आनंद आणि हे जीवघेणं स्माईल नसतं मिळालं मला आज.
ती परत एकदा हसली.
दोघही गाडीत बसले, गाडी चालत राहीली लाँग ड्राईव्हसाठी.
ती: कमाल आहेस तू. झोपलाच नाहीस? कसा काय आलास?
तो: कसा नाही येणार. धिस ईज द लास्ट चान्स फॉर स्पेंडींग टाईम विथ यू ऑन यूअर बड्डे. पुढल्या वर्षी... फोन तरी..
ती: नको आठवण करुन देऊस.

त्यांची गाडी गणपती मंदिरासमोर थांबली. दोघंही मंदिरात गेले, तसे ते नेहमीच भेटल्यावर तिथे जायचे. दर्शन घेऊन झाल्यावर ते दोघेही बाहेर येऊन बसले. शहराच्या गर्दीपासून दूर होतं मंदिर कसलीही गडबड गोंगाट नव्हता तिथे. थोडा वेळ बसल्यावर तिनं विचारलं त्याला.
ती: काय मागितलंस?
त्यानं हसून नकारार्थी मान हलवली.
ती: सांग ना
तो: तुला वाटतं तसं काहीच नाही.
ती: ...
तो: मला कशात आडकाठी घालायची नाहिए.
ती: ...
तो: आणि मी आता काहीही मागणंच सोडून दिलंय. मिळत तर नाहीच, कशाला हवी लाचारी?
ती: तू बोलून बघतंच नाहीस. हाच तर प्रॉब्लेम आहे.
तो: ...
ती: ...
तो: पुढल्या वर्षी तू तुझ्या घरी.. तुझ्या नवऱ्याच्या. का झालं, कसं झालं... कारणमीमांसा करण्यात काही अर्थ नाही..
ती: ...
तो: आजचा दिवस तुझ्यासोबत हवा होता.. मिळाला... अजून काय मागू.. काही नको.
ती: आय विश.. मागे जाऊन सगळं बदलता आलं असतं.
तो:जे बदलता येत नाही ते अ‍ॅक्सेप्ट करावं लागतं.
ती: कॉन्टॅक्टमधे रहायला तुला काय प्रॉब्लेम आहे? आपण मित्र सुद्धा राहू शकत नाही?
तो: प्रेम आहे तर राहू दे ना.. कशाला मैत्रीच्या चौकटीत अडकवतेस? आणि मला मागं फिरता येत नाही..
ती: अरे पण..
तो: तू पुढे चाललीएस.. चालत रहा.. माझा प्रवास ईथवरंच.. मी मागे नाही फिरणार पण ईथून पुढेही येणं... शक्य नाही.
ती: म्हणून माणूसंच तोडून टाकायचं?
तो: पण न भरणाऱ्या जखमेचं मूळ मिटवायलाचं हवं ना. आणि ठसठसणारी जखम बनून रहायचं नाही मला तुझ्या डोळ्यासमोर आयुष्यभर.
ती: तू विसरशील?
तो: प्रश्न विसरण्याचा नाहिचे.. प्रश्न असण्या आणि नसण्याचा आहे.. आणि जे ईनएविटेबल आहे ते ओढून ताणून ओरबडून मी का तुला त्रास देऊ? तुमच्या आयुष्यात लुडबूड करत राहण्यापेक्षा तुझ्या आठवणीत राहणं ईज बेटर.
ती: चल निघूया.

त्यानं तिच्या हातावर कॅडबरी ठेवली, म्हणाला तोंड गोड कर माझ्याकडून आणि अशीच गोड रहा आयुष्यभर. ईथून पुढच्या सगळ्याच बड्डेसाठी शुभेच्छा. लव्ह यू..
तिनं कॅडबरी पर्समधे ठेवली, रुमाल काढला आणि हळूच डोळ्याच्या कडा टिपल्या. तो हसला, म्हणाला चिअर अप, आजचा दिवस डोळ्यात पाणी नको आणूस. ती ही हसली.

त्यानं तिला ड्रॉप केलं
ती: थांब ना थोडावेळ अजून
तो: अजून थांबलो तर जाणं कठीण होईल..
ती: आय विश..
तो: खरं सांगायचं तर आय विश टू... बट विशेस डोंट ऑल्वेज कम ट्रू..
ती: ...
तो: काही गाठी सुटत नसतील तर त्या तोडाव्याच लागतात आणि नाही तोडल्या तर त्या आपोआपंच घट्ट होत जातात. नव्या जुन्यांचा गुंता होण्यापेक्षा जुन्या तोडलेल्याच बऱ्या.
लव्ह यू!

त्यानं गाडी वळवली, आरश्यात पाहून खिडकितून हात उंचावत बाय केला. ती गोठल्यासारखी तिथेच ऊभी होती. ईतकावेळ दाबून धरलेलं पाणी डोळ्यातून गालावर आलं त्याच्या आणि त्यानं गाडीचा वेग वाढवला. त्याचा फोन वाजला.. मेसेज तिचाच होता.
ती: विल ऑल्वेज मिस यू. विल चेरीश धिस डे फॉरएव्हर. आय विश आपण दोघेही ईथेच थांबलो असतो ना पुढे ना मागे... पण खरय वेळ कोणाच्याच हातात नाही. तुला मागे फिरायला आवडत नाही आणि मला माणसं तोडायला. अ‍ॅक्सेप्ट ईट ऑर नॉट यू विल ऑल्वेज बी अ स्पेशल फ्रेंड.

त्याच्या घट्ट मुठीतून घड्याळाची टिक टिक अजून तशीच चालू होती, आज एक वर्ष झालं होतं तिच्यासोबत साजरा केलेल्या वाढदिवसाला. तो भानावर आला.. डोळ्याच्या कडांत साठू पहाणाऱ्या पाण्याला मोठ्या प्रयत्नानं अडवलं. तिला किमान मेसेज करावा असं वाटत होतं त्याला पण त्यानं ठरवलं होतं तिच्या लग्नानंतर संपर्क करायचा नाही म्हणून. फोन खिशात ठेऊन तो निघणार ईतक्यात त्याचा फोन वाजला. सवयीनं फोन काढून त्यानं टचस्क्रिनवर बोट फिरवलं, वन मेसेज रिसिव्ह्‌ड.

ती: डोंट वरी डिअर, आय गॉट यूअर विशेस!

तो हसला, फोन शर्टच्या खिशात ठेवला अन त्यावर तळहात ठेऊन म्हणाला... "हॅपी बड्डे डिअर"

के.पी. आर

Saturday, May 10, 2014

आई


#HappyMothersDay
तू तर बोलूच नकोस रे काही, माहितीये तू किती अन कसा बदलला आहेस. वैतागलेली आई त्याला ऊद्देशून मोठ्यानं बोलत होती. आई अगं काय झालंय, काय केलं गं मी आणि काय बदललो कि तुला असं वाटतंय त्यानंही हतबल होऊन आईला प्रश्न विचारला. आई गप्प बसली काहीच बोलेना, तो दोन मिनिट आईसमोर तसाच ऊभा राहिला. त्यालाही शब्दाला शब्द देऊन विषय वाढवायचा नव्हता, मुळात याची सुरुवातंच कशी आणि कुठून झाली हे त्याला कळत नव्हतं. आई तोंड फिरवून खिडकीतून बाहेर बघत बसली, तो बॅग उचलून त्याच्या खोलीत गेला बॅग ठेवली आणि दरवाजा मागची गाडीची चावी काढून आईला म्हणाला, आई मी आलोच जाऊन तासाभरात. आईनं त्याच्याशी नजरा नजर करायचं टाळत, खिडकीतून बाहेर बघतंच हो म्हणून मान हलवली.

दारातली गाडी काढताना त्यानं एकवार खिडकीत बसलेल्या आईकडे पाहिलं, आईची नजर त्याला आरपार छेदून शून्यात रोखलेली होती. गाडी काढून निघाला तेव्हा तो हतबल झाला होता, त्याला राग येत होता आणि खूप वाईट वाटत होतं. राग परिस्थितीचा येत होता की स्वतःचा त्याला कळेना, कारण आई आबांवर चिडणं त्याला जमलं नसतंच कधी. वाईट अन हतबल वाटत होतं कारण त्याच्या, हो त्याच्या स्वतःच्या आई आबांना आज असं वाटत होतं की त्यांचा मुलगा बदललाय. त्याला स्पष्टीकरण द्यायला आवडायचं नाही कधीच पण त्याच्या अशा गप्प बसण्यामुळे गैरसमज निश्चितंच वाढत होते. त्यानं कोणाला बोलून दाखवलं किंवा नाही तरी आई आणि आबा हेच त्याची टॉप प्रायोरिटी होती कायमंच आणि आई आबांनीच आपल्याला ओळखू नये हि गोष्ट त्याला  छळत होती, त्यांनाच वाटावं आपण बदललोय. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, गाडीच्या काचेवर धुळीची पुटं चढल्यागत सगळं दिसू लागलं. शर्टच्या बाहीनं त्यानं डोळे पुसले, डोळ्यातलं पाणी दाबून धरल्यानं दाटून आलेला गळा दुखू लागला. त्यानं गाडी शांतपणे बाजूला घेतली, गाडीतली पाण्याची बाटली काढून तोंड धुतलं अन परत निघाला. पाचंच मिनिटात बायकोला पिक अप केलं त्यानं.

तुझे डोळे असे का दिसताएत आज, तू रड.. तिनं बिचकतंच विचारलं त्याला. तिच्याकडे न बघताच त्यानं म्युजिक प्लेअरचा आवाज वाढवला, मला हे गाणं खूप आवडतं म्हणाला. मी काय विचारलं तुला? ती परत त्याच विषयाकडे वळू लागली तसं त्यानं ओठांवर बोट ठेऊन तिला गप्प बसायची खूण केली आणि म्हणाला एवढं गाणं ऐकू दे मग बोलू. कुणाचं काय तर कुणाचं काय, कशाला कधी महत्व द्यावं हे या बाबाला कधी कळतंच नाही. खिडकीवर कोपर आणि तळहातावर हनुवटी टेकवून ती पुटपुटत राहिली. गाणं संपेस्तोवर त्यानं मनापासून स्वतःला समजावत डोळ्यातलं पाणी रोखलं आवंढा गिळला, मोठ्यानं जांभाई देऊन डोळ्यात पाणी आलंय म्हणत डोळे पुसले. गाणं संपल्यावर तिच्याकडे हसत पाहून म्हणाला, अगं आज मी टू व्हिलरवर गेलो होतो नगर रोडला आणि जेवणंही स्किप झालंय दुपारचं म्हणून चेहरा असा झालाय. तिनं चटकन त्याच्याकडे बघत खरं का म्हणून विचारलं? पुढचं गाणं लागलं आणि त्यानं कॅज्युअली आवाज वाढवला.

तो गाडी पार्क करेपर्यंत ती हॉस्पिटलमधे गेली. तिचं चेक अप होईस्तोवर तो वेटींग एरीयामधे बसून राहिला. बसल्या बसल्या सुद्धा त्याच्या डोक्यात सारखं आईचं वाक्य घोळत होतं, "तू किती आणि कसा बदलाएस माहितीए". ती पाचंच मिनिटात बाहेर आली, त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसली. त्यानं तिच्याकडे पाहिलं तर तिचे डोळे पाण्यानं डबडबले होते. त्याला कळेना हि का रडतेय, छातीतल्या वाढल्या धडधडीसोबत त्यानं विचारलं तिला,

तो: काय झालं अगं बोल तरी, काय म्हणाले डॉक्टर.
ती डोळ्यातलं पाणी न रोखता हसली.
तो अजूनंच बुचकळ्यात पडला.
ती: (ऊत्साहात) मी पाहिलं.. पाहिलं मी.
तो: ...
ती: (गालावर आलेलं पाणी न पुसता) आणि ऐकलं सुद्धा.
तो: ... (कुतुहलाने बघत)
ती: (पाची बोटं जुळवून वेगळी करत खुण करत होती) हलताना दिसलं... आणि अरे धडधड धडधड.. एवढी फास्ट..
तो: ...
ती: (त्याला मिठी मारत) मी फर्स्ट टाईम आपलं बेबी पाहिलं, आय कांट एक्स्प्लेन, नेक्स्ट टाईम तू आत ये सोनोग्राफीला. डॉक्टर सेड एव्हरीथिंग ईज जस्ट फाईन
तो डोळ्यातलं पाणी न रोखता फक्त हसला मनापासून.
ती: तुला न बघता कसं एवढं फिल होतंय?
तो: (मान हलवत) अहं..
ती: सांग ना.
तो: मी आपलं बेबी नाही पाहिलं अजून पण तुझ्या डोळ्यात मला "आई" दिसली.

त्यानं पटकन मोबाईल काढला, नंबर डायल केला...

तो: थोडा बदल झालाय गं.. ईतके दिवस मुलगा होतो फक्त आता बापसुद्धा होणारे. पण आई.. आई कधीच बदलत नाही गं आई. आई आबा तुम्हीच माझी लेकरं आहात आता.
फोन बंद केला, अजूनंही डोळ्यात आनंदाश्रू होते त्याच्या.

तसंच त्यानं बायकोकडे बघून फक्त मान हलवली, मनापासून हसला आणि फक्त म्हणाला
"आई"

के.पी. आर

Wednesday, May 7, 2014

दोघं - भाग ७

आजकाल त्याचं सगळं लक्ष मोबाईलमधेच असायचं. तसं पाहिलं तर त्याला फोन कोणाचेच येयचे नाहीत पण तरीही कुणीतरी खिदळल्यासारखे आवाज करत रींग वाजायची त्याच्या फोनची आणि तो हसत हसत फोनकडे बघायचा अन पटापट काही बाही टाईफ करुन परत वर बघायचा. जेवणाच्या टेबलवरही त्याच्या हातून मोबाइल सुटायचाच नाही. कधी विचार करत, कधी हसत, कधी वैतागून तो त्यात काहीतरी वाचायचा अन उजव्या हातानं जेवण थांबवून डाव्या हातानं काहीतरी टाईफ करायचा. आजूबाजूच्या कोणाचंच आणि कशाचंच त्याला भान नसायचं, आई आबांना हे असलं वागणं बिलकुल रुचत नव्हतं त्याचं. पण आता पोरगं मोठं झालंय असल्या गोष्टीमधे त्याला बोलायला नको असं वाटायचं दोघांना. काहीही असलं तरी पोरगं भानातून गेलंय हे मात्र दोघांनाही कळून चुकलं होतं.


हॉल आणि जेवणाचं टेबलंच काय घेऊन बसलात जेवण झाल्यावर त्याच्या रुममधे झोपायला गेल्यावर निम्म्या रात्रीपेक्षा जास्तवेळ याचं मोबाईल पुराण अखंड चालायचं. रात्रीच्या शांततेमधे अगदी हळू आवाजातली रींगटोन पार शेजारच्या घरातही ऐकू जायची मग घरातल्यांना न समजणं तर दूरची गोष्ट होती. मग एकदा आईनं विचारलंही त्याला की काय फालतूपणा चाललाय? कोणाला एवढी उचकी लागतेय तुझ्या नावाची निम्म्या रात्रीची सुद्धा? त्यावर त्यानं ऊत्तर दिलं होतं अगं मी तर ११ लाच झोपलो होतो, काय बोलतीएस तू?
आई: (सूचक नजरेनं त्याच्याकडे बघत) फोन सायलेंट करुन काही फायदा नाही, व्हायब्रेटर घुरघुरतो रात्रभर.
मग त्याला जाणवलं रींगटोन बंद करावी अन व्हायब्रेटर ऑन ठेवावा तर फोनचं गुरगुरणं सगळीकडेच ऐकू जायचं. नजर चुकवून त्यानं विषय बदलला आणि तेवढ्यापुरती वेळ मारुन नेली.


त्यानंतर मात्र तो फोन पूर्णपणे सायलेंट करुन ठेवू लागला, फोनला सिक्युरीटी कोड आला आणि निर्धास्तपणे तो झोपायला जाईपर्यंत फोन कुठेही पडू लागला त्याचा. रात्री मात्र फोन सायलेंट करुन मेसेज मेसेज खेळायचे ते दोघं. २-३ वाजत आले की त्याला झोप येयची, आधी झटपट रीप्लाय करणारा तो मग तीन तीन - चार चार मिनिट होईपर्यंत रीप्लाय करायचा नाही.

ती: झोपलास का?
तो: नाही नाही.. उद्या मूव्ही ला जाऊया, गेस्ट सेमिनारंच तर आहे, व्हॉट से?
आता तिचा रीप्लाय येईपर्यंत झोपी जायचाच तो पण मग तिला कळू नये म्हणून फोन बंद डोळ्यावर ठेऊन द्यायचा. तिचा रीप्लाय आल्यावर बॅकलाईट ऑन व्हायची अन त्याला जाग येयची. हा असा खेळ ती झोपी जाईपर्यंत चालायचा.

दिवस दिवस एकत्र घालवून आणि रात्रभर एसेमेस नी जागवूनही दोघांनाही नक्की माहीत नव्हतं की आपल्यात नेमकं नातं काय आहे.
आपण बेस्ट फ्रेंड्‌स आहोत, की त्यापेक्षा जरा जास्तं की आपल्याला फक्त एकमेकांची सवय लागलीये खूप. सगळंच कन्फ्युजिंग होतं जाम.
तिला मी आवडतो कि ती माझ्याशी मोकळ्या मनानं फ्रि वागते खूप आणि वेगळा अर्थ आपणंच काढतोय? ती हिंट देतेय आपल्याला की आपणंच मनाचे मांडे रचतोय? कि तिनंही मनोमन हे अ‍ॅक्सेप्ट केलंय.
हां.. विचार करुन करुन त्याच्या डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली होती. त्याचं बाकी कशातंच लक्ष लागेना. ती कॉलेजला येणार नसेल तर त्याला ते ८-१० तास खूप जड जाऊ लागले, दुसरं कोणी तिच्याशी जवळीक करत असेल तर उगाचंच जेलस फिल होऊ लागलं. एक दोनदा त्यानं कॉलेज बुडवून पाहिलं, वाटलं त्याला कि ती मिस करेल आपल्याला पण तसं काहीच झालं नाही. खूप वाट पाहून पाहून त्यानंच मेसेज केला तिला अन तिचाही त्यावर जुजबी रीप्लाय.  आता त्याला बिलकुलंच कळेना हे काय होतंय. त्याला आता हा सस्पेंस ब्रेक करायचा होता, बाकी सगळ्याच गोष्टी, सगळेच रीलेशन्स आता अफेक्ट होऊ लागले होते. त्याला हे बिलकुल सहन होईना, आतल्या आत त्याची घुसमट चालू होती, ना धड ईकडे ना तिकडे च्यायला लिफ्ट मधे असताना अचानक लाईट जाऊन आर्धा वरच्या न आर्धा खालच्या मजल्यावर अडकून पडावं अशी अवस्था झाली त्याची. तिच्या मनात नेमकं काय आहे हे त्याला आता माहिती करुनंच घ्यायचं होतं, हो तर हो.. आणि नाही तर... नाही.. आर या पार

 त्यानंतरही बरेच दिवस त्याची विचारायची हिंमत होईना, अगदी जीभेवर आलेले शब्द मागे फिरु लागले. त्याच्या वागण्या बोलण्यात एवढा अडखळलेपणा कधीच नव्हता. एक दिवस कॉलेज सुटल्यावर त्यानं हिंमत करुन सांगितलं तिला.
तो: मला बोलायचंय तुझ्याशी.
ती: (बाकिच्या ग्रुपसोबत टवाळक्या करत) बोल ना..
तो: असं नाही.. फक्त..
ती (अजूनंही बाकिच्यांमधेच दंग.) ...
तो: मी तुझ्याशी बोलतोय.
ती: (बेफिकिरपणे) अरे हो मी सुद्धा बोलतेच आहे की. बोल ना.
तो: (जरासा वैतागून) तुला म्हणालो ना असं नाही म्हणून.
ती: (त्याच्याकडे न बघता, समोरच्या मित्राशी बोलत बोलतंच) अरे मग कसं?

त्यानं ग्रुपमधल्याच एका मित्राला विचारलं तू सोडशील का तिला जाताना? तो हो म्हणताच हा तिच्याकडे न बघता सगळ्यांना ऊद्देशून बाय म्हणून चालू लागला. ती त्याच्या पाठोपाठ आली.

ती: (काहीच न झाल्यासारखं) काय रे काय झालंय काय तुला आजकाल?
तो: (वैतागून) काही नाही, वेड लागलंय.
ती: अरे असं काय करतोएस?
तो: जा ना तू बिझी आहेस फार..
ती: तू कुठे चाललाएस पण?

मला उशिर झालाय म्हणून ती काही बोलायच्या आतंच त्यानं गाडी काढली. ती मागे बसली, तिला ड्रॉप करेपर्यंत दोघांनीही तोंडातून चकार शब्द नाही काढला. गाडीवरुन उतरताना ती फक्त त्याला सॉरी म्हणाली, तिला माहीती होतं तिनं जाणूनबुजून त्याच्या बोलण्याकडे मगाशी दुर्लक्ष केलं होतं. तो वैतागलेला असूनंही तोंडदेखलं हसत काहीही न बोलता निघून गेला.

त्यानंतर ते दोघेही एकमेकांशी जरा अंतरंच राखून वागले, बऱ्याचदा ती सगळेच लेक्चर अटेंड करु लागली. तोही काही ना काही कारणं सांगून कट्ट्यावर बसणं टाळू लागला, भेटणं टाळू लागला. पण अशा वागण्यानं प्रश्नाचं ऊत्तर मिळणार नव्हतं उलट ते दोघंही प्रश्नालाच बगल देत होते.त्याला या आधांतरी जगण्याचा कंटाळा आला होता, एक दिवस त्यानं मनाची तयारी करुन ठरवलं आज बोलायचंच. त्यानं मेसेज टाईप केला चार चारदा वाक्य शब्द चेक केले.. डिलीट केले.. परत लिहिलं.. आर्धा तास मोबाईल तसाच हातात ठेवला आणि शेवटी तिला मेसेज पाठवला.

तो: I can't take it anymore.. मला तुझ्याशी बोलायचंय. आत्ता.. इग्नोअर करु नकोस प्लिज.
ती: प्लिज आपण नंतर बोलूया? दोन आठवड्यात आपली फायनल एक्झाम आहे आणि I don't want to get in to... प्लिज समजून घे.. मी फेल होईन.
तो: तुला आयडीया आहे मी काय बोलणारे?
ती: म्हणूनंच म्हणतेय, थोडा पेशन्स ठेव. मी फेल होईन.. मला फेल नाही होयचं रे.
तो: I care a damn about exam. मला आत्ता बोलायचंय. नाही बोललो तर मी फेल होईन.
ती: ...
तो: एकतर आज नाहीतर कधीच नाही. Choice is yours.
ती: ...
निम्मी रात्र त्यानं तळमळत काढली.. मग कधी झोपी गेला ते त्यालाच कळलं नाही. पहाटे साडे तीनला तिचा मेसेज आला.
ती: बोल, एम रेडी टू हिअर..
तो खडबडून जागा झाला, त्यानं बराच वेळ विचार करुन मेसेज लिहिला..
तो: I think I have started liking you... Love, Like.. Like Love.. बराच विचार करुन शेवटी त्यानं Like लिहिलं.
ती: I knew.. तू हेच बोलणार...
तो: ?
ती: Please don't get in to this.. मला सुद्धा हिच भीती आहे.. I have started liking you too.. पण
तो: पण काय..
ती: I don't want to go beyond this.
तो: पण का? I really love you... (हिम्मत करुन शेवटी "Love" लिहिलंच त्यानं)
ती: I don't want to get in to this. We are friends & will always be. तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस.
तो: ठिके.. मी परत हा विषय परत कधीच नाही काढणार. Promise me आपली मैत्री यानं अफेक्ट नाही होणार.
ती: Promise :)


दोन चार दिवस असेच गेले त्यानं तो विषय परत नाही काढला, साधी हिंट सुद्धा नाही. वरवर कितीही प्लेन वागला तरी त्याचं त्यालाच कळत होतं आतमधे त्याची अवस्था काय होतेय ते. मग एक दिवस कॉलेज सुटल्यावर ती म्हणाली त्याला, "चल ना मस्त कुठेतरी चक्कर मारु एक, कि तुला घरी जायची घाई आहे". ऊत्तरादाखल त्यानं बाईक चालू केली आणि तिला फक्त बसायची खूण केली. सिटीच्या ऐन मध्यवस्तीमधे एक ब्रिज होता तिथून सनसेट मस्त दिसायचा. सनसेट बघून दोघेही निघाले, गाडीवरच्या २०-२५ मिनिटांच्या प्रवासात एक चकार शब्द नाही काढला दोघांनी. त्यानं तिला घराबाहेर ड्रॉप केलं आणि निघणार एवढ्यात.
ती: थांब ना..
तो काहीही न बोलता थांबला, तिच्याकडे फक्त पाहिलं.
ती: (लाजून) असं नको ना पाहूस.
त्याची प्रश्नार्थक नजर.
ती अजूनंच लाजली, त्याच्या बाईकच्या बटनाशी खेळत त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली.
तो: काsssय.
तिनं फक्त काही नाही म्हणत मान हलवली आणि हसली.
ती त्याच्याकडे बघणं टाळत होती, त्यानं बाईकला किक मारली आणि म्हणाला चल मी निघतो.
ती: (घाईगडबडीत त्याच्याकडे बघून) थांब ना रे..
त्याला तिचं विचित्र वागणं कळेना, गाडी तशीच चालू ठेऊन तिच्याकडे एकटक बघत तो बोलला.
तो: काय ते पटकन बोल ना, साडे सात वाजत आले.
तिनं परत एकदा त्याच्याकडे बघणं टाळलं, मान खाली घालून नकारार्थी हलवली, गालातल्या गालात हसली परत, मागे वळून जाऊ लागली आणि जाता जाता पाठमोरीच बाsssय म्हणाली.
ती घरात निघून गेली तरी तो तिथेच उभा होता. त्यानं गाडी बंद केली आणि तिला मेसेज पाठवला.


तो: Thanks.. Thanks a lot!
ती: पण कशासाठी..?
तो: तुला जे बोलली नाहीस ना त्यासाठी. आता होकाराचा रिप्लाय नाही केलास तरी चालेल. "I love you" :)


के.पी. आर

Sunday, May 4, 2014

दोघं - भाग ६


आज दिवसाची सुरुवात मस्तं झाली होती. बऱ्याच दिवसांनी तिला उशिरापर्यंत झोपायला मिळालं होतं, आज ना सकाळचा अलार्म होता, ना घाईघाईत उठून आवरायचं होतं, ना धावत पळत ऑफिसची बस पकडायची होती, ना कुणाचे फोन, अन आलेच तर तिला कळणार नव्हतंच कारण आदल्या दिवशी झोपतानाच तिनं  फोन सायलेंट करुन ठेवला होता. तिला जाग आली तेव्हा डोक्यावर पंखा गरागरा फिरत होता आणि जमिनीवर गरमंच हवा फेकत होता. त्याचाही नाईलाजंच होता म्हणा, टेंपरेचरंच एवढं वाढलं होतं की सकाळी सकाळी घामाच्या धारा लागत होत्या. पण तिनं गरम हवा, वाढलेलं टेंपरेचर आणि अकार्यक्षम पंखा असल्या फुटकळ गोष्टींकडे आज दुर्लक्षंच केलं होतं, कसल्याही क्षुल्लक कारणावरुन चिडचिड करुन तिला सुट्टी वाया घालवायची नव्हती. तिनं उठून पहिल्यांदा पडदे बाजूला करुन खिडकी उघडली आणि दिर्घ श्वास घेतला. कुणीतरी नुकतंच कुंड्यांना पाणी घातलं होतं. ओल्या मातीचा वास उरात भरुन घेत ती मनापासून खुश झाली, तिला हवी तशीच दिवसाला अगदी परफेक्ट सुरुवात झाली होती.
ती तिच्याच नादात "पुरा~~ लंडन ठुमकदा" गाणं म्हणत हॉलमधे आली. तिच्या गाण्याची चाल ओरीजनल गाण्याच्या किंचितही जवळपास सुद्धा जात नव्हती पण ती असं गाणं म्हणतेय म्हणजे ती चांगल्याच मूडमधे असणार हे त्याला पक्क ठाऊक होतं. ती हॉलमधे आली तेव्हा तो किचेनमधे तिच्यासाठी ओट्‌स बनवत होता, तिची चाहूल लागताच मागे वळून न बघता मोठ्यानं अन मोठ्या प्रेमानं गूड मॉर्निंग म्हणाला. ती अजूनंही हॉलच्या खिडक्या उघडत तिच्याच नादात "हंगामा हो गया" म्हणत होती.
तो: (आता मागे बघत) ओय क्वीन, गूड मॉर्निंग.
ती: (हातानंच काय म्हणून खुणवत) गूड मॉर्निंग. काय अजून घरी तू?
तो: (तोंड वाकडं करत) हो ना मला जेलस फिल होतंय, तू घरी आराम करणार आणि मी.. असो
ती: (चिडवल्यासारखं हसत) जा जा.. दर सॅटर्डेला तुला सुट्टी असते आणि मी ऑफिसला जाते तेव्हा?
तो: ...
ती: (लाडात) ए.. ऐक ना, तुला आज सुट्टी नाही काढता येणार? जायलाच पाहिजे का?
तो: (वाकुल्या दाखवत) आता का? हा??
ती: ए सोड ना चेष्टा.. चल कुठेतरी जाऊया मस्त, एखादा पिक्चर बघू.. टू स्टेट्‌स आलाय.
तो: ...
ती: ओय, चल की काय भाव खातोस, मी दाखवते मूव्ही..
तो: ना~~ही.. शक्य नाही आज
ती: बर चल लंच पण.. तोही मीच देते.. अब बोलो..
तो विचार केल्यासारखा चेहरा करुन काही बोलणार एवढ्यात
ती: अब आया ऊट पहाड के नीचे.. चल मी आवरु पटकन.
तो: (ओट्‌सची डिश तिच्यासमोर ठेवत) सॉरी.. नॉट पॉसिबल. एम.डी सोबत अपॉइंटमेंट आहे माझी.
ती: (हवेत हात उडवत) जा जा..
तो: बाय..
ती: ...
तो: बा~~~~य..
ती: (नाराजीनंच) बाय.
तो जातो न जातो तेवढ्यात तिचा फोन वाजला, मेसेज त्याचाच होता.
तो: सॉरी, आज खरंच पॉसिबल नव्हतं. उद्या एकदम लवकर येतो.
ती: :( एनीवेज ड्राईव्ह सेफली..
तो गेल्यानंतरचे दोन तास  आळसात, आवरण्यात, कपाट लावण्यात गेले तिचे. आज सासू सासरे सुद्धा एका लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. दुपारचं जेवण एकट्यानं करायला नको वाटायला लागलं तिला, रोजं ऑफीसमधे काय घरचे सोबत नसायचे पण तरीही घरी कसं सगळे असल्याशिवाय बरं वाटायचं नाही तिला. आणि तो ही नेहमीच म्हणायचा, "असली मजा सब के साथ". तसंही सकाळी त्यानं केलेले ओट्‌स खाल्ले होते तिनं आणि जेवणंही कमीच होतं तिचं, मग काय टिव्ही बघत काहीतरी सटरफटर खाल्ल तिनं. टिव्हीवरंही फारसं काही बघण्यासारखं नव्हतं. तिनं वैतागून घड्याळाकडे पाहिलं, दुपारचे साडे तीन वाजत आले होते. आळोखेपिळोखे देत तिनं झोपायची तयारी केली, टिव्हीचा टायमर लाऊन मस्त ताणून दिली. झोपेतून उठल्यावर, सगळ्या घरातल्या लाईट्‌स लावत देवापुढे दिवा लावला तिनं, रामरक्षा म्हटली. आपसूकंच प्रसन्न वाटू लागलं तिला. तसं फार मोठं घर नव्हतं त्यांचं; टेरेस, पार्कींग वगैरे पकडून २५०० वगैरे स्क्वेअर फिट असावं. दिवसा फारसं काही नाही वाटायचं पण रात्री खूप एकटं एकटं वाटायचं, एकट्याला तसं नकोच वाटायचं पण आज ईलाजंच नव्हता. बाहेर जाऊन भाजी, फळं आणावी असं वाटत होतं तिला पण दिवे लागणीला दार बंद करुन जायची ईच्छा होईना मग हॉलची मोठी खिडकी ऊघडून ती बाहेर बघत बसली. बाहेरचा सगळा गोंगाट आत आला, गाड्या, हॉर्न्‌स, लाईट्‌स, लोकांचे आवाज आणि गा~~र वारा. ती तिच्याच नादात बाहेर बघत बसली. बराच वेळ तिथे बसल्यानंतर तिला त्याचं बोलणं आठवलं, "खिडकी बंद ठेवत जा रे तुम्ही लोकं, त्या आवाजानं डोकं उठतं माझं", खिडक्यांशी त्याचं काय वाकडं होतं कुणास ठाऊक, हॉल, बेडरुम कुठेही तो आला की पहिल्यांदा खिडकी बंद करायचा आणि ती आली कि पहिल्यांदा खिडकी उघडायची. चालू बंद चा हा खेळ रोजचा होता. आज मात्र खिडकी बंद करायला तो घरी नव्हता, तिनं स्वतःशीच हसत खिडकी बंद केली आणि त्याचा फोन आला.
तो: काय करतीएस?
ती: काय करणार, खिडकीमधे बसले हॉलच्या.
तो: डोकं नाही दुखत का गं तुमचं त्या गोंगाटानं? झोपायच्या आधी खिडकी बंद कर बर का.
ती फक्त हसली.
तो: हसू नकोस, काळजी वाटते म्हणून बोललो
ती: (त्याला चिडवत) ओहो, काळजी आहे तर मग जायचंच नाहीस ना, एकटीला सोडून.
तो: नसतो गेलो गं पण काय करणार कंपनी माझ्या पप्पाची नाही ना.
ती: आणि हो सासऱ्याचीही नाही, बिच्चारा तू.
तो: (कुत्सितपणे हसत) ते सोड, काय केलंस आज?
ती: काहीही नाही. आज माझा एक ऊनाड दिवस होता.
तो: जेवलीस की नाही?
ती: खाल्लं सटरफटर..
तो: ...
ती: नाही झाली माझी ईच्छा एकट्यानं खायची.
तो: ...
ती: असं काय करतोस.
तो: ...
ती: मग मला न्यायचं होतंस.
तो: तुला माहीतीये ते शक्य नव्हतं.
ती: मग सोड तर.
तो: आता नीट जेवणारेस तू.
ती: ...
तो: मी काय बोलतोय.
ती: बघू..
तो: बघू नाही.. नक्की.. समजत नाही का तुला?
ती: तुलाच समजत नाहीए..
तो: अगं असं काय
ती: एवढं मोठं घर आपलं, मी एकटी, रात्र.. नाही ईच्छा होत.
तो: (हसत) तुला भीती वाटतीये.. सोडून बोल.. मला नको सांगूस.
ती: हंम्म्म.. भीती नाही.. एकटं वाटतंय.
तो: ...
ती: कसा रे तू, कशाला गेलास मला एकटीला सोडून? आता मला झोप नाही येणार.
तो: पण तू एकटी कुठे आहेस.
ती: (फणकाऱ्यानं) आता फालतू फिल्मी डायलॉग्‌ज मारु नकोस. माझ्या आठवणी आहेत ना वगैरे..
तो: ना~~ही...
ती: मग
तो: ज्युनिअर मी आहे ना तुझ्यासोबत
ती: पोटावर हळूवार हात ठेवत हसली स्वतःशी.
तो: एकटा तर मी आहे.
ती: ...
तो: बेडटाईम स्टोरी सांग बेबीला.
ती: चल फोन ठेव. आम्हाला डिस्टर्ब होतंय.
तो: टेक केअर. मुआह टू पिल्लू.
ती: गूड नाईट.
फोन कट करत तिनं त्याला मेसेज पाठवला
ती: आय लव्ह यू.
बेडवर येऊन पडली, पोटावर हात ठेवून बोलू लागली
ती: एक होती चिऊ, एक होता काऊ... चिऊचं घर होतं मेणाचं...

के.पी. आर

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...