स्वयपाकघरात थोडी लुडबूड
हल्लीच्या मुलींना स्वयपाकही येत नाही....
कविता वगैरे ठिक आहे, पण सांगा त्यांना कवितेनं पोट मात्र भरत नाही.
स्वयपाकच काय.... सगळ्याच गोष्टीत बायकोला मदत आम्ही करु.
स्वयपाक तिने केला तर भाजी आणायची जवाबदारी हाती आमच्या धरु.
पण स्वयपाकही आम्हीच केला तर ती काय फ़क्त कविता करेल?
बिचाऱ्या नवऱ्यासोबत त्या शब्दांनाही तव्यावर धरेल....
यमक जुळवता जुळवता भाजी खुडायची राहते
दूध ऊतू जाऊन गॅसवरुन मग किचेन ओट्यावर वाहते....
भातात किती पाणी घालू? अजून आईला विचारता....
अरे वरणभातही शिजवता येईना, पण मुलांना कवितेतही धारेवर का धरता?
प्रत्येक सणाला सासुरवाडिवरुन आईला येतो फोन....
सगळ्या सणांना पुरणपोळीचा नैवेद्य का गं.... त्रासिक असतो टोन.
आर्धा किलो गुळ, दिड किलो डाळ, दोन-चार वेलदोडे अन टाकू का जायफळं दोन????
(दोन जायफळं????) अगं जेवतानाच झोपतील जावाईबापू, आईनं सांगताच आदळते तिकडून फोन.
ईडलीचं पिठ किती दिवस भिजवायचं?
आईनं भिजवून दिलं तर किती वेळ शिजवायचं?
पोळ्या म्हणजे तर एकेका राज्याचा नकाशा असतो....
जेवण म्हणजे भूगोलाचा तास.... अन ऑफिसात डबा ऊघडल्या ऊघडल्या हशा पिकतो.
कधीतरीच घरी ईडली किंवा जरा वेगळा बेत असतो....
आर्ध कच्चं आर्ध पक्क शिजलं की पुरता बेत फसतो....
हा फसलेला बेत अन तिचा त्रागा पाहून नवरा बचावात्मक पवित्रा घेतो.
अन स्वयपाकघरातला राडा तसाचं ठेवून मग तिला घेऊन हॉटेलात जेवायला जातो.
जेवता जेवाता विचारतो मग, ए एवढ्यात कवित केली नाहीस का कुठली नवी....?
विसर जरा ते स्वयपाकघर अन घरकाम (ते तर रोजचंच आहे)... एक खरं सांगू, तुझ्यासारखी रसिक बायको मिळायला खरंच नशिबाची साथ हवी....
कुणाल