
नथुराम गोडसे का बोलतोय????
नथुराम गोडसे देशासाठी मेला का?
गांधीजींना मारुन तो देशाचं भलं करुन गेला का?
त्याच्या तीन गोळ्य़ांनी एक शरीर मेलं.
त्याच तीन गोळ्य़ांनी गांधीजींच्या विचारांना अजरामर केलं.
अंग झाकायला एक पंचा अन हाती काठी घेऊन सत्याग्रह कोण करतो?
अंग झाकायला एक पंचा अन हाती काठी घेऊन सत्याग्रह कोण करतो?
एका हाकेवर जनतेला एकत्र आणणारा, देशासाठीच मरतो.(दुसऱ्याला मारुन नव्हे)
विलायतेहून शिकून आलेला वकिल, गोऱ्यांच्या विरोधात अहिंसेचे शस्त्र घेऊन ऊभा राहतो.
घरची श्रीमंती लाथाडून, एका आश्रमातून देशाच्या स्वातंत्र्याला त्याचा प्रत्येक श्वास का वाहतो?
जहाल काय नि मवाळ काय, सर्वांचेच ध्येय होते समान.
जहाल काय नि मवाळ काय, सर्वांचेच ध्येय होते समान.
फक्त बापूच नाही, टिळक, नेताजी अन भगतही होते महान.
शिवबांच्या तलवारीची आठवण नथुरामने करुन देऊ नये.
त्या शूर वीराचं पवित्र नाव एका कटकारस्थानि खुन्याने घेऊ नये.
सत्याग्रह अहिंसा सगळं साफ झूठ आहे, हे आता नथुराम आम्हाला शिकवणार का?
सत्याग्रह अहिंसा सगळं साफ झूठ आहे, हे आता नथुराम आम्हाला शिकवणार का?
सत्याग्रह, म्हणजे सत्याचा आग्रह आम्ही नथुरामच्या सांगण्यावरुन सोडणार का?
एका निशःस्त्र माणसावर गोळ्या झाडून त्यानं काय अटकेपार झॆंडा लावला?
याउपर बापूंना महान म्हणून, त्यानं मनाचा किती मोठेपणा दावला....
कोणी म्हणावं असं की, देशासाठीच जन्मणार अन देशासाठीच मरणार????
कोणी म्हणावं असं की, देशासाठीच जन्मणार अन देशासाठीच मरणार????
मनातंच ज्याच्या राम नाही तो कुणाला मारुन रामराज्य काय आणणार?
नथुराम गोडसे बोलतोय म्हटलं की सगळे कान टवकारुन ऐकणार.
गांधीजींवर टिका करायची एकही संधी कशी काय सोडणार????
उचलली जीभ लावली टाळ्याला,
उचलली जीभ लावली टाळ्याला,
पण ....बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही ही खरी भ्रांत आहे.
म्हणूनंच डोळे, कान, तोंड बंद.... आणि सगळे शांत आहे.
कुणाल.