
परतून तू येशील का????
तू गेलीस अन बघ,माझ्या कवितेचा विषय संपला.
आयुष्याचा ईथे आशय संपला.
श्वासांशीही चालू आहे अंतिम झगडा,
आता जगण्याचा माझा निश्चय संपला.
जाताना तू, मागे आठवणी का ठेवून गेलीस?
जगण्याची शपथ माझ्याकडून घेताना, आयुष्यभर सोसायला मरणयातना देऊन गेलीस.
खरंतर जीवघेणीच ठरलीए तुझी हि देवघेव.
काळीजंच ऊरलं नाही आता, पण तू सांगतेस
आपल्या प्रेमाची ज्योत या काळजाच्या कोपऱ्यांत सदैव तेवत ठेव.
एक काळ होता असा, माझी स्वप्नंही तुझ्यांच तालावर नाचू लागलेली.
पण आता मात्रं स्वप्नांची फूलं आसवं बनून या डोळ्यांच्या कडांमधे साचू लागली.
काटेरी निवडुंगातही सौंदर्य पाहणारा मी, पण आता मला कोमल फूलही टोचू लागली.
जीवनाच्या सगळ्याच रंगात मला आता दाहकताच दिसू लागली.
अजूनही आठवतो मला तो दिवस.....
त्या मंगलमय सोहळ्यात सारा साज-श्रुंगार माझ्या मनालाच नाही तर तुलाही टोचत होता.
आणि सनईचौघड्याचा मंगलमय सूरही मला भेसूरंच भासत होता.
तुझी जवाबदारी पेलण्यास समर्थ असणारे खांदे आज मात्रं झुकले होते.
कारण मला बिलगलेले पारीजातकाचे फूल आज कुणी परक्यानेच खुडले होते.
तुझ्या नजरेतल पाऊस, तेव्हापासून माझ्या काळजांत बरसतो आहे.
शुष्क डोळ्यांनी जगताना, मी मात्रं तुझ्या ओंजळीत गाळलेल्या माझ्याच आसवांच्या दोन थेंबांसाठी अजूनही तरसतो आहे.
एकदाच मला तू माझ्याच अश्रूंचे दोन थेंब परत देशील का?
माझ्या पापण्यांना ओलावा देण्यासाठीतरी, एकदाच तू परत ईथे येशील का......
परतून तू येशील का????
कुणाल