Tuesday, November 11, 2014

सरबजीत सोबत भारताचा स्वाभिमानही मेला??


मरेस्तोवर दुर्लक्षित असलेला सरबजीत
मेल्यावर... मेला म्हणू नका
शहीद म्हणा... देशाचा वीर...
एक कोटीची मदत... पंचवीस लाखाची मदत
२२ वर्षाच्या यातना सव्वा कोटीत विकत घेण्याचा
जीवघेणा अन निर्लज्ज प्रकार...
सरकारकडून पाकिस्तानचा निषेध...
हल्लेखोरांना कडक शासन होईल याची आशा
(अरे डोळे झाकून दूध पिणाऱ्यांनो अजून कळत का नाही हे जेलमधल्या कैद्यांचं कृत्य नाही ही पाकिस्तानची नापाक नीती आहे)
आज ताणले गेलेले संबध सुरळीत करण्यासाठी
दोन महिन्यांनी परत प्रयत्न..
मग भारत पाक क्रिकेट सिरीज
अमन की आशा
खिरापतिसारखे व्हिसा वाटप...
अन पुन्हा ये रे माझ्या मागल्या...
मॅच बघायला म्हणून आलेले
कित्येक ईथेच पांगतील
आधार कार्डासाठी रांग लाऊन त्यांचा हक्कही सांगतील
अन पाकिस्तानातल्या जेलमधे सरबजीतवर हल्ला केला तसाच
परत एकदा...
भारतातंच भारतीयांवरंच होईल हल्ला...
त्यातल्या एखाद्या अतिरेक्याला पकडून
ठेवली जाईल त्याची बडदास्त
परत एकदा टिकेचा मारा
निषेधाचे पुळचट शब्द...
लोकसभा तहकूब...
"आम्ही तुमच्याशी क्रिकेट खेळणार नाही जा" हा गर्भित ईशारा
अन चार दिवसांनी वाटचाल
नव्या हल्ल्याकडे...
हे सारं असंच चालणार का?
चालू द्यायचं का?
सरबजीत गेला...
हुतात्मा झाला...
कणाहीन राजकारण्यांसारखं
असंच म्हणत रहायचं???
की डोळे ऊघडून समजून घेयचं
सरबजीत सोबत भारताचा स्वाभिमानही मेला??

(जागं व्हायचं की आपणही पडून रहायचं सुस्त
थंड रक्तानं, दगडी अंतःकरणानं...
पुळचट राजकारण्यांचा वाण नाही पण गुण लागला म्हणत??)

के पी आर

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...