
कुणाल.
का लिहितोस असं कोणी विचारेल तर माझ्याकडे काहीही उत्तर नाही. मला लिहावं वाटतं, मनापासून वाटतं हे पुरेसं नाही का!

कुणाल.

तुमचं आणि त्यांचं.....
त्यांची टोपी, त्यांचा बुरखा.
तुमचा भगवा पंचा नि अंगरखा.
त्यांची मेणबत्ती त्यांचा क्रॉस
तुमची उदबत्ती नि तुमचा विश्वास
तुमची प्रार्थना त्यांचा नमाज
तुमचा डावीकडे त्यांचा ऊजवीकडे समास.
तुमचा देव त्यांचा अल्ला.
तुमचा पंडीत त्यांचा मुल्ला.
तुमचं प्रेम त्यांच ईश्क.
तुमचा ॐ त्यांचं ७८६ (सेवन एट सिक्स).
तुमचा शुभ विवाह त्यांचं कबूल कबूल कबूल.
तुमचे राजा राणी त्यांचे मिया मक्बूल.
तुमचं मंदिर त्यांची मशिद
तुमचा राम त्यांचा रशिद.
ते जहाल तर तुम्ही तर कुठे मवाळ ?
ते दगडधोंड्यापरी तर तुम्ही कुठे रवाळ ?
तुमची कविता त्यांची गजल.
तुमची सभा त्यांची मैफल.
तुमची दिवाळी त्यांचा रमजान.
तुमची भूपाळी त्यांची अजान.
म्हणतांत ना "व्यक्ती तितक्या प्रकृती"
देशद्रोह नि अतिरेकीपणा हा नसतो कुणाचा धर्म, ती तर असते व्यक्तिगत विकृती.
आपला राष्ट्रध्वज आहे तिरंगी.
कुठल्याही एका रंगाने पूर्ण ध्वज होण्याचा हट्ट धरु नये, तो हिरवा असो वा नारींगी.
तुमचं शिवालय त्यांचा ताजमहाल.
अरे पण रक्त नसतं हिरवं किंवा भगवं, सगळ्यांच्या रक्ताचा रंग असतो लाल.
म्हणूनच म्हणतो कशासाठी हा सारा नावांचा वाद.
फक्तं एक भारतीय माणूस म्हणूनच घेऊया खरा जीवनाचा आस्वाद.....
तुमचा आणि त्यांचा, सर्वांचा
कुणाल.

कुणाल

"पाऊसही.... चिंब ओला असेल"
आजकालच्या पावसांत भिजूनही मी कोरडाच असतो.
तुझ्या प्रेमळ आठवणीनं भिजलेल्या मनाला, हा पाऊसही कोरडाच भासतो....
पण तरीही आजही मी एकटांच मनसोक्त भिजतो.
तुझ्या आठवणींचा शृंगार करुन ओलेत्यानं सजतो.
त्या पावसाचं नि मातीचं आपल्यासारखंच आहे एकमेकांवर अगदी खरं प्रेम.
वर्षभर धुळ ऊडवणारी धरणी, दरवळते सुगंध, झेलून पावसाळी अत्तराचा पहिलाच थेंब.
मी एकटाच नाही असा, जो तुझ्या आठवणीत तरसतो.
विरहांत झुरणारा तो पाऊसही धरणीला आलिंगन देण्यासाठी बेधूंद होऊन बरसतो.
आणि तू सुद्धा, तू सुद्धा अशीच कुठेतरी माझ्या आठवणीत एकटीच भिजते आहेस.
आपल्या प्रेमाचं बीज तुझ्या मनी विरहांतही रुजते आहे.
या बीजाला विरहाच्या पावसातही नक्कीच अंकुर फुटेल.
अगं, अगं धीर धर थोडा, बघता बघता आपल्या दोघातला दुरावाही आता चटकन मिटेल.
हा चार दोन दिवसाचा दुरावाच बघ आपल्याला एकमेकांच्या कीती जवळ आणतोय.
आणि त्यात हा पाऊस......
त्याचा प्रत्येक थेंब न थेंब आपल्या दोघांतली विरहाची दरी सांधतोय.
दुरावा संपवून लवकरंच तू मला, वीजेपेक्षाही जास्त कडाडून भेटशील.
त्या पावसाचा थेंब न थेंब झेलून मग, मला बाहुपाशांत लपेटशील.
तेव्हा मात्रं तो पाऊस माझ्यासाठी कोरडा नसेल.....
तेव्हा मात्रं तो पाऊस माझ्यासाठी कोरडा नसेल.....
आपल्या धुंद प्रणयानं आणि तुझ्या प्रेमळ स्पर्शानं तोही चिंब ओला झाला असेल.
कुणाल.
खरं सांगतो मित्रांनो पाऊस मला आवडतो.....
पावसाच्या गारव्यानं पूर्वी मन कसं प्रसन्न होत होतं.
आज मात्रं २६ जुलैच्या आठवणीनं सुन्न होत जातं.
कुणाल






तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...