
खरंच बापू....खरंच तुम्ही हरलात.
बापू.... प्रत्येक नोटेवर आज तुमचं चित्र आहे.
तुमच्याच नावानं राजकारणही सर्वत्र आहे.
अहिंसा वगैरे शब्द आता फक्त पुस्तकात दिसतात.
अहिंसेवर भाषण देणाऱ्याचे हात मात्र निष्पापांच्या रक्तानं माखलेले असतात.
तुमच्या तीन माकडांचाही अर्थ प्रत्येकजण सोयीनंच लावतो.
चांगलं, बोलण्या वागण्या अन ऐकण्यापासून प्रत्येकजणंच दूर दूर धावतो.
सत्याचा आग्रह वगैरे सध्या फार मोठं पाप आहे.
शांततेच्या मार्गानं न्यायासाठी झगडणाऱ्याला अन्यायाचा शाप आहे.
तुमच्या मूल्यांची ईथे कधीच राखरांगोळी झाली आहे.
सत्य पेटलं, अहिंसा जळली.... आम्हीच त्यांची होळी केली आहे.
कसलं सत्य, अन कसली अहिंसा.... बघा तुम्ही तेव्हा चुकलात ना.
सत्य बित्य सगळंच झूठ आहे तुम्ही आमच्याकडून शिकलात ना?
अहिंसेसाठी प्राण गमावलात ना तुम्ही.
पण हिंसेसाठी तुमचंच चित्र असलेली नोट मोजतो आम्ही.
ईतक्या वर्षात न समजलेली तुमची तत्व, तीन तासात मुन्नाभाई आम्हाला शिकवतो.
गांधीगिरीच्या मार्गानं जगा.... तो आम्हाला सुचवतो.
गांधीवादामधला गांधी संपवला या देशानं.... आता फक्त वाद उरलाय.
देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण एक महात्मा हरलाय.
खरंच बापू....खरंच तुम्ही हरलात.
तुमचं कोण ऐकतं ईथं.... एका मुन्नाभाईच्या रुपानं तेवढं तुम्ही प्रत्येकाच्या मनात उरलात.
कुणाल.
1 comment:
खरच !
Post a Comment