Tuesday, November 11, 2014

Prakash


मावळत्या सूर्याकडे करुन पाठ
राहिलो जरी ऊभं
नव्या नवख्या अंधारात भिजवून काठ
काळवंडला जरी नभं
बघता बघता पेटतात चांदण्या ईरेला
स्वतःला जाळूनंही वाती, ऊजळवतात घराला
अन तेव्हाच तर मिटल्या पापण्यामागं स्वप्नांचा खेळ चालतो
काळोख आहे म्हणूनंच तर आपण ऊजेडाच्या दिशेनं चालतो
चांदवा मनापासून आभाळात राहतो तेवत
मन मात्र खुळं राहतं काळोखालाच दिवस-रात्र मनामधे ठेवत
कोणी किती झाकून ठेवलं जरी कोंबडं
फुटायचं तेव्हा फुटतंच असतं तांबडं
सोन्यासारखी झळाळते मग नभाची किनार
रात्र कितीही लांबली तरी सांगा काळोखाला
आता लवकरंच सकाळ होणार
आता लवकरंच Prakash  येणार...

के पी आर

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...