त्याच्या कापलेल्या गळ्यातून
वाहून गेला...
जातीय सलोखा..
तुटलेल्या हाडा-काडातून
भंगली एकात्मता..
अंगभरच्या वळांमधे
रुतून बसली गुलामगिरी
ऊघड्याच राहिलेल्या डोळ्यामधे
अजरामर झाली भीती
डोळ्यातल्या पाण्यासोबत
वाहून गेली माणूसकी
मंद होणाऱ्या श्वासासोबत
खोल खोल वाढत गेली दरी
विरत चालल्या किंचाळी सोबत
बहिरे होत गेले कान
त्याच्या जीवासारखाच
अकाळी मेला विश्वास
निपचीत पडल्या बेवारस मड्याला
शिवत राहिली अस्पृश्यता
पेपरात आल्या बातमी अन फोटोला
चिकटले निषेध अन राजकीय महत्वकांक्षा
पेटल्या चितेमधे
जळून झाली खाक स्वप्न, ईच्छा, आकांक्षा अन निरागसता
मडकंभर राख मिसळली पाण्यात
.
.
सारं सारं संपलं तरी मागं राहिली जात..
के पी आर

No comments:
Post a Comment