का लिहितोस असं कोणी विचारेल तर माझ्याकडे काहीही उत्तर नाही. मला लिहावं वाटतं, मनापासून वाटतं हे पुरेसं नाही का!
Tuesday, February 2, 2010
"होम कॉलिंग"
एक पाऊल पुढे आणि मागचं सारंच संपणार होतं
जीवन-मरणाच्या लढाईत आज मरणंच जिंकणार होतं
संपणार होता तो अन त्याच्यासोबत...
अपयाशाचा कलंक
राजा बनायला चाललेला एक अपयशी रंक
थांबवता येत नाही म्हणून चालू असलेला श्वास
जगण्यावर असलेला-नसलेला विश्वास
कधीहि न संपणारी अविरत मालिका ती अपयशाची
उरी बाळगलेली खोटी आशा ती यशाची
मैत्री प्रेम नि नात्यांची सारी ती बंधनं
थकलेल्या काळजाची सारी ती स्पंदनं
अपयशाच्या खपलीखाली जपलेली जिवंत वेदना
अपयशाच्याच धास्तीनं मेलेली संवेदना
स्वप्नं सत्य आशा निराशा....
टचके टोमणे अन होणारी फरफट आताशा.
जिद्द स्पर्धा हाल-अपेष्टा...
अपेक्षांच्या ओझ्याखाली होणारी चेष्टा
पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात फोन त्याचा वाजला
"होम कॉलिंग"...
पाणावलेल्या डोळ्यानंच त्यानं फोनवरचा मजकूर वाचला.
"होम" या एका शब्दानंच त्याचं पाऊल तिथंच अडलं
अन चूक स्वतःची उमजून ते पोर ढसाढसा रडलं
घरातून अजूनही त्याला कोणीतरी बोलावत होतं
अपयशाच्या दरीतही त्याला यश खुणावत होतं.
त्यालाही कळून चुकलं,"टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही"
यशाची चावी सहजासहजी अशी कुणाच्याही हाती देव पण देत नाही.
मागे फिरत परत जिंकण्याचा त्याने केला मग निर्धार.
कारण घरच्यांची माया, मित्रांचं प्रेम अन जिद्दिचा होता त्याला आधार.
माघार घेऊनही आज तो खरंतर जिंकला होता...
अपयश आणि निराशेचा अंधःकार प्रेम अन जिद्दिच्या संधीप्रकाशानं संपला होता...
कुणाल प्रकाश रुद्राके.
Subscribe to:
Post Comments (Atom)
दोघं - भाग १५
तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...
No comments:
Post a Comment