
वणवा!
तुझं तरुण रक्त आज उसळंत आहे.
तुझ्यांत ठासून भरलेला असंतोषच बाहेर काढण्यासाठी जणू ते सळसळंत आहे.
असंतोषाची ठिणगी बाहेर पडून वणव्याचं घेईल रुप.
अराजकता जाळताना, आगीत तुझेही हात होरपळतील खूप.
जळतानाही नवसंजीवनी मिळाल्यासारखा अराजकतेचा राक्षस पुन्हा ऊभा राहिल.
त्या क्षणी मात्र सांभाळ स्वतःला, कारण तेव्हा तुझा संयम तुला सोडून जाईल.
देशभरातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नि मंत्र्यांचे घोटाळे.
दिवाळखोरी जाहिर करुन सहकारी संस्थांना ठोकलेले टाळे.
शेतकाऱ्यांच्या जमिनी मातीमोल किंमतीत विकून, स्पेशल ईकॉनिक झोनला दिलेली परवानगी.
सरकारी खर्चानंच जणू, शेतकऱ्याची केली मृत्यूलोकी रवानगी.
जेसिका, प्रियदर्शनी काय नि कोठेवाडि काय अजूनहि स्त्रीयांची होते ईथे विटंबना.
यांत मी काय करु नि कसं हे बदलू, या विचाराने आपल्यांच मनाची होणारी कुचंबणा.
राजकारणी नि गुंडामधला आता कळतंच नाही फरक.
हे सारं पाहून तुझ्या डोळ्यांत अश्रू उभे राहतील नि पेटून ऊठशील तू खरंच.
तेव्हा मात्र अश्रू थोपवू नकोस, त्यांना मोकळी वाट करुन दे.
डोळ्यातल्या पाण्याचंच रुपांतर आता या वणव्यामधे होऊ दे.
हा वणवांच आता अनिर्बंधपणे सारं अराजक जाळून टाकेल.
सत्यासाठी पेटून उठलो तरंच आता या देशाची अस्मिता टिकेल!
तुमच्यातलांच एक....
कुणाल.
1 comment:
Tumche SHABDVED chan aahe...tyala asech phuludya...
Post a Comment