Monday, April 15, 2013

आत्ताशी सुरुवात आहे



कसे गेले नाही दिवस..
कधी भेटलो रे आपण?
आठवतंय तुला??
अगदी काल परवाच..
कित्ती कित्ती वर्ष झाली
ओळखतोय एकमेकांना
तरीही..
फ्रेश नातं..
अगदी थोड्यावेळापूर्वी बरसलेल्या
टपोऱ्या पावसारखं
वहीतल्या शेवटच्या पानावरंच
रमायचो आपण जास्त
फुली गोळा, चित्र विचित्र नक्षी
अन त्यातंच चोरुन लिहिलेलं
एकमेकांचं नाव..
अजून जपून ठेवलीयेत मी ती पानं
एकटी असते तेव्हा
मांडते टेबलावर, भरभरुन बघते
अन हसते स्वतःशीच खुळ्यासारखी
काय काय करायचास नाही
मला चिडवण्यासाठी..
अन माझ्या नाकावरचा राग पाहून
चेव चढायचा तुला अजून
मी ही फुरंगटून बसायचे मग
मला हसवण्यासाठी पायाशी आणून ठेवायचास जग
लग्न ठरल्यानंतर..
रोजंच संध्याकाळी धरुन ठेवायचास हात
घरी जायला रोजचाच ऊशीर
डोळे वटारुनंच आई घ्यायची आत
काय काय केलं आपण..
कुठे कुठे फिरलो..
नॅचरल्स, केन हाऊस, कॉफी शॉप्स..
भांडलो तंटलो चिडलो जरी एकमेकांवर
तरी ओवाळून टाकतोस ना जीव माझ्या खुश असण्यावर
करते ना मी ही चूका परत परत वेड्यासारख्या
पण तरीही घेतोस ना समजून मला
अगदी लहान लेकरासारखा..
सासर माहेर असं कधी
जाणवूनंच दिलं नाहीस अंतर
काय अन किती बोलू
डोळ्यातूनंच व्यक्त व्हावं त्यापेक्षा खरंतर
अजूनही चालत रहावं वाटतं चांदण्यात
तुझ्यासोबत तासन्‌तास.
सगळंच नवीन असल्याचा होतो भास
कसे गेले नाही दिवस
तरीही सगळं सग्गळं
अगदी काल परवा घडल्यासारखं वाटतं
अन तूही तसाच आहेस..
अजूनही "वेडा"
माझ्यासाठी आणि आपल्या प्रेमासाठी...

जपशील ना हे वेड असंच...??? नेहमी??

(काहीही विचारते नाही मी कधी कधी खुळ्यासारखी)

थांबतेय ईथेच.. सगळ्याच कवितांना शेवट नसतो..
कारण आपली तर आत्ताशी सुरुवात आहे.

कुणाल प्रकाश रुद्राके

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...