तू पोहचल्याची चाहूल दिलीच त्या सरीनं
कितीही नको म्हटलं तरी..
तुलाही माहीतीये
सवय माझी..
निश्चिंत मनानं
डोळे मिटण्याआधी
मिटल्या पापण्यात
ती सर साठवण्याआधी
तुझी खुशाली कळणं
किती गरजेचं असतं...
आता निघाल्याची बातमी नाही..
भेटूच लवकर...
कुणाल प्रकाश रुद्राके
No comments:
Post a Comment