पाऊसअसं वाटतं....
सगळी दुःख वाहून जाईपर्यंत
या पावसांत एकट्यानंच चिंब भिजावं.
सोबत फ्क्त तुझ्या आठवणी असाव्या,
बाकी कुणीच नसावं.
बरसणाऱ्या या धारांमधे
आसवं सगळी मिसळून जावी.
आसवं माझी पुसायला
तूच परत माझ्याकडे यावी.
अधुरं हे स्वप्नं माझं
आज ना ऊद्या पूर्ण व्हावं
अधुरंच राहणार स्वप्नं हे जाणवतांच
आसवं गाळून जडावलेल्या पापण्यांनी कायमचंच निजावं......
वाट पाहतोय.....
कुणाल.
No comments:
Post a Comment